शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एटापल्लीत घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: May 19, 2014 23:32 IST

एटापल्ली येथे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे आहेत. त्याचबरोबर गढूळ पाण्याचे डबके असल्याने यामधून निर्माण झालेल्या दुर्गंधीचा त्रास एटापल्लीवासीयांना

एटापल्ली : एटापल्ली येथे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे आहेत. त्याचबरोबर गढूळ पाण्याचे डबके असल्याने यामधून निर्माण झालेल्या दुर्गंधीचा त्रास एटापल्लीवासीयांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात असली तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आदिवासींच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी गोटूलची निर्मिती एटापल्ली येथे करण्यात आली. एटापल्ली येथे उभारण्यात आलेले एकमेव गोटूल असून येथे विविध शासकीय व खाजगी कार्यक्रम होतात. परंतु गोटूल परिसरात पाण्याची डबकी व घाणीचे साम्राज्य असल्याने गोटूल परिसरात असणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोटूलला लागूनच बोअरवेल आहे. बोअरवेलच्या पाण्यामुळे परिसरात खड्डे पडून डबके निर्माण झाले आहेत. परंतु पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गोटूलच्या समोरच महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा असून याला लागूनच बोअरवेल आहे. परिसरातील नागरिक बोअरवेलचे पाणी भरत असल्याने वाया गेलेले पाणी पुतळ्याच्या समोर साचून राहते. साचलेल्या पाण्यात डुक्कर व इतर जनावरे बसून राहत असल्याने घाण सर्वत्र पसरली आहे. या परिसरात शहीद पोलीस शिपाई श्रीनिवास दंडीकवार यांचे स्मारक आहे. या स्मारकासमोर नेहमीच कचर्‍याचे ढिगारे साचून असतात. गोटूलला लागूनच मटन मार्केट आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली असते. परिसरातील दुकानदार व इतर नागरिक गोटूल परिसरातच कचरा फेकत असल्याने कचर्‍याच्या साम्राज्यात आणखीच वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गोटूल परिसरात कचराकुंडी ठेवावी व या कचर्‍याची नियमित उचल करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसाच्या पाण्याने कचरा कुजून दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या घाणीमुळे एटापल्लीवासीयांचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)