शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

जिल्ह्यातील १५६ गावांमध्येच दुष्काळसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:34 IST

गडचिरोली : अवकाळी पाऊस, पूरपरिस्थिती आणि मावा-तुडतुड्यासारखा रोग यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. तरीही जिल्ह्यातील १३३७ ...

गडचिरोली : अवकाळी पाऊस, पूरपरिस्थिती आणि मावा-तुडतुड्यासारखा रोग यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. तरीही जिल्ह्यातील १३३७ गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा जास्त असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. एकूण खरीप पिकांच्या गावांपैकी १५६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. त्यामुळे त्याच गावांना दृष्काळसदृश परिस्थितीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही गावे आरमोरी आणि कोरची तालुक्यातील आहेत.

खरीप पिकांच्या वेळोवेळी केलेल्या पीक पाहणी अहवालाच्या आधारे प्रशासनाने सन २०२०-२१ या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची अंतिम सरासरी पैसेवारी ही ६३ आहे. जिल्ह्यात एकूण १६८८ गावे आहेत. त्यापैकी खरीप पिकांची गावे १५४४ आहेत. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रबी गावांची संख्या १० आहे. त्यापैकी पीक नसलेली गावे ६१ आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात खरीप पीक असलेल्या एकूण १४९३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यात ५० पैशाच्या आतील गावे १५६, तर ५० पैशाच्या वर पैसेवारी असलेल्या गावांची संख्या १३३७ आहे.

वैनगंगा नदीच्या पुरामुळे देसाईगंज, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील काही गावांमधील पीक खरडून गेले. पण त्या गावांमध्ये पैसेवारी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

(बॉक्स)

तालुकानिहाय अशी आहे अंतिम पैसेवारी

- गडचिरोली-५९, धानोरा-६७, चामोर्शी-५९, मुलेचरा-७४, देसाईगंज-५७, आरमोरी-६७, कुरखेडा-६८, कोरची-४६, अहेरी-७०, एटापल्ली-६५, भामरागड-५७, सिरोंचा-७१ पैसे याप्रमाणे पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

- ५० पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १५६ गावांमध्ये आरमोरी तालुक्यातील २२ आणि कोरची तालुक्यातील १२८ गावांचा समावेश आहे. कोरची तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ यापुर्वीच जाहीर करण्यात आला आहे.