शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जिल्ह्यातील १५६ गावांमध्येच दुष्काळसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:34 IST

गडचिरोली : अवकाळी पाऊस, पूरपरिस्थिती आणि मावा-तुडतुड्यासारखा रोग यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. तरीही जिल्ह्यातील १३३७ ...

गडचिरोली : अवकाळी पाऊस, पूरपरिस्थिती आणि मावा-तुडतुड्यासारखा रोग यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. तरीही जिल्ह्यातील १३३७ गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा जास्त असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. एकूण खरीप पिकांच्या गावांपैकी १५६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. त्यामुळे त्याच गावांना दृष्काळसदृश परिस्थितीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही गावे आरमोरी आणि कोरची तालुक्यातील आहेत.

खरीप पिकांच्या वेळोवेळी केलेल्या पीक पाहणी अहवालाच्या आधारे प्रशासनाने सन २०२०-२१ या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची अंतिम सरासरी पैसेवारी ही ६३ आहे. जिल्ह्यात एकूण १६८८ गावे आहेत. त्यापैकी खरीप पिकांची गावे १५४४ आहेत. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रबी गावांची संख्या १० आहे. त्यापैकी पीक नसलेली गावे ६१ आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात खरीप पीक असलेल्या एकूण १४९३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यात ५० पैशाच्या आतील गावे १५६, तर ५० पैशाच्या वर पैसेवारी असलेल्या गावांची संख्या १३३७ आहे.

वैनगंगा नदीच्या पुरामुळे देसाईगंज, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील काही गावांमधील पीक खरडून गेले. पण त्या गावांमध्ये पैसेवारी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

(बॉक्स)

तालुकानिहाय अशी आहे अंतिम पैसेवारी

- गडचिरोली-५९, धानोरा-६७, चामोर्शी-५९, मुलेचरा-७४, देसाईगंज-५७, आरमोरी-६७, कुरखेडा-६८, कोरची-४६, अहेरी-७०, एटापल्ली-६५, भामरागड-५७, सिरोंचा-७१ पैसे याप्रमाणे पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

- ५० पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १५६ गावांमध्ये आरमोरी तालुक्यातील २२ आणि कोरची तालुक्यातील १२८ गावांचा समावेश आहे. कोरची तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ यापुर्वीच जाहीर करण्यात आला आहे.