शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

झिंगानुरातील धान करपले

By admin | Updated: November 10, 2014 22:43 IST

परिसरातील बोड्या व तलाव पूर्णपणे कोरडे पडले असल्याने धानपीक करपायला लागले आहे. यावर्षीही उत्पन्न होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

झिंगानूर : परिसरातील बोड्या व तलाव पूर्णपणे कोरडे पडले असल्याने धानपीक करपायला लागले आहे. यावर्षीही उत्पन्न होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. झिंगानूर परिसरात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. याची पुनरावृत्ती यावर्षी होईल याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी जड धानाची लागवड केली. जड धानाचा दर्जा चांगला राहत असल्याने या धानाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. त्याचबरोबर जड धानाचे उत्पादनही हलक्या धानापेक्षा जास्त होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी जड धानाला प्राधान्य दिले. मात्र अपेक्षेप्रमाणे यावर्शी पाऊस पडला नाही. सुरूवातीचे टाकलेले पऱ्हे पाण्याअभावी करपले. त्यानंतर कर्ज काढून शेतकऱ्यांनी धान पिकाचे बियाणे खरेदी केले व धानाची रोवणी केली. मागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. सुरूवातीला शेतकऱ्यांनी तलावातील व बोड्यांमधील पाणी धानपिकाला देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तलावांमधील जलसाठाही पूर्णपणे संपला आहे. परिणामी कर्जेली, किष्टयापल्ली, कोर्लामाल, कार्लाचेक, कोपला, पुल्लीगुड्डम, अमडेली, पातागुड्डम, रायगुड्डम, पेंडालय्या, सिरकोंडा, गंगनूर, कोत्तागुड्डम, रोमपल्ली, झिंगानूर, झिंगानूर माल, झिंगानूर चेक, मंगीगुड्डम, वडधेली, येडचेली, रमेशगुड्डम आदी २१ गावांमधील धानपीक करपायला लागले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. धानाचे उत्पादन होणार नसल्याने कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. झिंगानूर परिसरातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता या परिसरात दुष्काळ जाहीर करून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, परिसरातील शेतकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)