शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

पिकांसाठी गाढवी नदी ठरतेय जीवनदायिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके घेऊन ताे आपली आर्थिक उन्नती साधताे. आरमाेरी तालुक्यात गाढवी, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह नाले व ओढे आहेत. परंतु, जाेगीसाखरा परिसरात गाढवी नदीतील पाण्याचा सर्वाधिक वापर भाजीपाला, टरबूज, मका व कडधान्य पिकाच्या लागवडीसाठी करतात. त्यामुळे गाढवी नदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, पिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.

गाढवी नदी बारमाही वाहते. त्यामुळे नदीतील पाण्याचा वापर करून अनेकजण विविध पिके घेतात. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील परिसर हिरवाकंच दिसताे. गाढवी नदीकिनारी जोगीसाखरा, पळसगाव, डोंगरगाव, उसेगाव, फरी, कासवी, आष्टा, रामपूर, कनेरी, अंतरजी आदी गावे आहेत. नदीलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी मोटार पंप पाईपलाईन तयार करून आपल्या शेतापर्यंत पाण्याची व्यवस्था केली आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपालावर्गीय पिके तसेच टरबूज शेती केली जात आहे. याशिवाय विटांचा व्यवसायदेखील नदीच्या पाण्यावरच केला जात असल्याने स्थानिक मजुरांना रोजगारही मिळत आहे. एवढेच नव्हे तर लगतच्या गावांना पिण्याच्या पाण्याची नळ योजना गाढवी नदीवरूनच कार्यान्वित केली आहे. गाढवी नदीवर इटियाडोह असल्याने उन्हाळी पिकांसाठी पाणी साेडले जाते. याचा फायदा आरमाेरी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना हाेताे. मात्र, नहर बंद झाले की, नदीचे पाणी लगेच कमी होते. तरीही गाढवी नदीत पाण्याची पातळी बऱ्यापैकी टिकून आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यासाठी हाेत आहे. गाढवी नदीच्या उपकाराने जाेगीसाखरा परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

बाॅक्स

बंधाऱ्यांची गरज

नदीतील पाणी उपसा करण्याचे प्रमाण वाढले, मात्र त्यामानाने गाढवी नदीचे पाणी जमिनीत भूगर्भामध्ये साठविण्यासाठीची व्यवस्था अजूनपर्यंत झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. यावर शासन-प्रशासनाने लक्ष देत ठिकठिकाणी बंधारे बांधणे व जमिनीत पाणी मुरण्यासाठी खड्डे खाेदणे आवश्यक आहे. तसेच नदीकिनारी असलेल्या गावांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपापल्या स्तरावरून भूगर्भात जास्तीत-जास्त पाणी साठवून जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.