शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

पिकांसाठी गाढवी नदी ठरतेय जीवनदायिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके घेऊन ताे आपली आर्थिक उन्नती साधताे. आरमाेरी तालुक्यात गाढवी, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह नाले व ओढे आहेत. परंतु, जाेगीसाखरा परिसरात गाढवी नदीतील पाण्याचा सर्वाधिक वापर भाजीपाला, टरबूज, मका व कडधान्य पिकाच्या लागवडीसाठी करतात. त्यामुळे गाढवी नदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, पिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.

गाढवी नदी बारमाही वाहते. त्यामुळे नदीतील पाण्याचा वापर करून अनेकजण विविध पिके घेतात. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील परिसर हिरवाकंच दिसताे. गाढवी नदीकिनारी जोगीसाखरा, पळसगाव, डोंगरगाव, उसेगाव, फरी, कासवी, आष्टा, रामपूर, कनेरी, अंतरजी आदी गावे आहेत. नदीलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी मोटार पंप पाईपलाईन तयार करून आपल्या शेतापर्यंत पाण्याची व्यवस्था केली आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपालावर्गीय पिके तसेच टरबूज शेती केली जात आहे. याशिवाय विटांचा व्यवसायदेखील नदीच्या पाण्यावरच केला जात असल्याने स्थानिक मजुरांना रोजगारही मिळत आहे. एवढेच नव्हे तर लगतच्या गावांना पिण्याच्या पाण्याची नळ योजना गाढवी नदीवरूनच कार्यान्वित केली आहे. गाढवी नदीवर इटियाडोह असल्याने उन्हाळी पिकांसाठी पाणी साेडले जाते. याचा फायदा आरमाेरी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना हाेताे. मात्र, नहर बंद झाले की, नदीचे पाणी लगेच कमी होते. तरीही गाढवी नदीत पाण्याची पातळी बऱ्यापैकी टिकून आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यासाठी हाेत आहे. गाढवी नदीच्या उपकाराने जाेगीसाखरा परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

बाॅक्स

बंधाऱ्यांची गरज

नदीतील पाणी उपसा करण्याचे प्रमाण वाढले, मात्र त्यामानाने गाढवी नदीचे पाणी जमिनीत भूगर्भामध्ये साठविण्यासाठीची व्यवस्था अजूनपर्यंत झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. यावर शासन-प्रशासनाने लक्ष देत ठिकठिकाणी बंधारे बांधणे व जमिनीत पाणी मुरण्यासाठी खड्डे खाेदणे आवश्यक आहे. तसेच नदीकिनारी असलेल्या गावांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपापल्या स्तरावरून भूगर्भात जास्तीत-जास्त पाणी साठवून जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.