शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांसाठी गाढवी नदी ठरतेय जीवनदायिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जाेगीसाखरा : पाणी व सिंचनाची साधने असल्यास शेतकरी कधीही आर्थिकदृष्ट्या मागास राहात नाही. विविध प्रकारची पिके घेऊन ताे आपली आर्थिक उन्नती साधताे. आरमाेरी तालुक्यात गाढवी, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह नाले व ओढे आहेत. परंतु, जाेगीसाखरा परिसरात गाढवी नदीतील पाण्याचा सर्वाधिक वापर भाजीपाला, टरबूज, मका व कडधान्य पिकाच्या लागवडीसाठी करतात. त्यामुळे गाढवी नदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, पिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.

गाढवी नदी बारमाही वाहते. त्यामुळे नदीतील पाण्याचा वापर करून अनेकजण विविध पिके घेतात. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील परिसर हिरवाकंच दिसताे. गाढवी नदीकिनारी जोगीसाखरा, पळसगाव, डोंगरगाव, उसेगाव, फरी, कासवी, आष्टा, रामपूर, कनेरी, अंतरजी आदी गावे आहेत. नदीलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी मोटार पंप पाईपलाईन तयार करून आपल्या शेतापर्यंत पाण्याची व्यवस्था केली आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपालावर्गीय पिके तसेच टरबूज शेती केली जात आहे. याशिवाय विटांचा व्यवसायदेखील नदीच्या पाण्यावरच केला जात असल्याने स्थानिक मजुरांना रोजगारही मिळत आहे. एवढेच नव्हे तर लगतच्या गावांना पिण्याच्या पाण्याची नळ योजना गाढवी नदीवरूनच कार्यान्वित केली आहे. गाढवी नदीवर इटियाडोह असल्याने उन्हाळी पिकांसाठी पाणी साेडले जाते. याचा फायदा आरमाेरी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना हाेताे. मात्र, नहर बंद झाले की, नदीचे पाणी लगेच कमी होते. तरीही गाढवी नदीत पाण्याची पातळी बऱ्यापैकी टिकून आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यासाठी हाेत आहे. गाढवी नदीच्या उपकाराने जाेगीसाखरा परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

बाॅक्स

बंधाऱ्यांची गरज

नदीतील पाणी उपसा करण्याचे प्रमाण वाढले, मात्र त्यामानाने गाढवी नदीचे पाणी जमिनीत भूगर्भामध्ये साठविण्यासाठीची व्यवस्था अजूनपर्यंत झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. यावर शासन-प्रशासनाने लक्ष देत ठिकठिकाणी बंधारे बांधणे व जमिनीत पाणी मुरण्यासाठी खड्डे खाेदणे आवश्यक आहे. तसेच नदीकिनारी असलेल्या गावांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपापल्या स्तरावरून भूगर्भात जास्तीत-जास्त पाणी साठवून जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.