शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

पुढारलेल्या जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:22 IST

ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाला अर्धेच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतर कोणत्याही जातीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी राष्ट्रपती, राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून ओबीसी महासंघ तालुका देसाईगंजने केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतींना निवेदन : ओबीसी महासंघ देसाईगंजची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाला अर्धेच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतर कोणत्याही जातीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी राष्ट्रपती, राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून ओबीसी महासंघ तालुका देसाईगंजने केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मंडल आयोग, केंद्रीय आयोग, खत्री आयोग, बापट आयोग आदी आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे. राणे समितीने दिलेले आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसले नाही. परंतु आता राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जनसुनवाई ठेवली आहे. मराठा समाज हा प्रगत आहे. आतापर्यंत मराठावाड्यातील जनसुनावणीत अनेक मराठा संघटनाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशाप्रकारची निवेदने दिली आहेत. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा समाजाकडे राजकारणातील अनेक पदे आहेत. शिक्षण संस्था, बँका, सहकार क्षेत्र, कारखाने, व्यवसाय, उद्योगधंदे, शेती इत्यादी क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. तरीही या समाजाला आरक्षण द्यावे, असे वाटत असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे.राज्य मागासवर्ग आयोगाकडूनच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या उद्देशालाच हडताळ फासण्यासारखे आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास राज्यात व देशात अराजकता निर्माण होईल. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगच जबाबदार राहील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा व इतर कोणत्याही प्रगत जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे.सदर निवेदन उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी मुरलीधर सुंदरकर, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, धनपाल मिसार, लोकमान्य बर्डे, सरपंच राजेंद्र बुल्ले, योगेश नाकतोडे, नरेश चौधरी, रामजी धोटे, दामोधर शिंगाडे, एकनाथ पिल्लारे, अविनाश ठाकरे, दिलीप नाकाडे, दिनकर राऊत, किशोर पिल्लारे आदी उपस्थित होते.