शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मतभेद आणि मनभेद दूर करणारा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:41 IST

तीळ संक्रांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. कोणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनोमिलन घडविणारा हा सण मनुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.

ठळक मुद्देतिळाच्या गोडव्यातून गैरसमज हद्दपार करायोगिता पिपरे नगराध्यक्ष, गडचिरोली

तीळ संक्रांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. कोणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनोमिलन घडविणारा हा सण मनुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.पूर्वी संक्रांतीला तीळगुळ घरोघरी नेऊन वाटले जायचे. आज वॉर्डावॉर्डात महिलांचे मेळावे घेऊन त्यांना एकत्रित केले जाते. या निमित्ताने महिलांची चर्चा होते. त्यांची मनं जुळतात. विशेष म्हणजे अनेक वेळा कोणतेही ठोस कारण नसताना केवळ गैरसमजातून अबोला किंवा राग केला जातो. ही गोष्ट सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नासवणारी आहे. पण या सणाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या महिला मनातील मळभ दूर करून सकारात्मकतेची नवीन सुरूवातच करतात. त्यामुळेच हा सण महिलांवर्गात प्रिय असतो.तीळगुळाच्या गोडव्यातून गोड बोलण्याचा संदेश देणाऱ्या या सणाचे महत्व त्यामुळेच मोठे आहे. आपण ही संस्कृती जपली पाहिजे. यासोबतच नवीन वर्षातील या पहिल्या सणाच्या निमित्ताने आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, चांगली पुस्तके वाचणे असे काही संकल्पही महिलांनी करावे.युवा पिढी मोबाईलच्या नादात बिघडत आहे. केवळ मनोरंजनात्मक गोष्टीत अडकून न पडता मनाला शांती देणाºया चार गोष्टी केल्यास कधीही मन अस्वस्थ होत नाही. तीळ संक्रांतीच्या निमित्ताने याचाही संकल्प आपण करूया.