शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वाघ व बिबट्यांच्या दहशतीने जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 5:00 AM

गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शेतशिवारात पाळीव जनावरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर वाघबिबट्यांकडून हल्ले हाेण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. मागील महिनाभराच्या कालावधीत आठ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे. अशातच आता जंगलात वाघबिबट्यांची संख्या वाढायला लागली आहे. शेतावर जात असलेल्या नागरिकांवरही वाघ व बिबट्यांचे हल्ले हाेत आहेत. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. शेतावर जाणारा रस्तासुद्धा जंगलातून जाते. मंगळवारी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा खुर्द येथील भीमदेव नागापुरे या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. बुधवारी ही घटना उघडकीस आली. गाेंडपिंपरी तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब आष्टी परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले हाेते. मनाेज तिरूपती देवावार या सात वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले तर धानाेरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावातील एका महिलेच्या घरी बिबट्या शिरला. वनविभागाने त्याला पकडून जेरबंद केले. वाघ व बिबट्यांचे हल्ले वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आठ दिवसांपासून वाघ मिळेना- नरभक्षक असलेल्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी नागझिरा येथील स्पेशल टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून ही टीम वाघाचा शाेध घेत आहे. मात्र वाघ मिळाला नाही.

आष्टीतील बिबट्याने अखेर मुलाचा बळी घेतलाचमागील दाेन महिन्यांपासून आष्टी परिसरातील पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर आहे. काेंबड्या, शेळ्या, बकरे, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून त्यांना ठार केले. या बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत हाेती. मात्र, वन विभागाने लक्ष दिले नाही. अखेर साेमवारी पेपर काॅलनीतील एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात बालक बचावला. बुधवारी पुन्हा आष्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या मार्कंडा कं. येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मुलावर हल्ला केला. त्यात बालक ठार झाला. आता तरी या बिबट्याला जेरबंद करणार काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :leopardबिबट्याTigerवाघ