शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

वैनगंगेवरील जिल्हाबंदी नाका नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी संचारबंदी हा सर्वाेत्तम पर्याय असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा ...

काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी संचारबंदी हा सर्वाेत्तम पर्याय असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा करण्यावर प्रतिबंध घातल्यास विविध कारणांसाठी हाेणारी गर्दी कमी हाेण्याचे प्रमाण कमी हाेईल, या उद्देशाने जिल्हा सीमाबंदी घालण्यात आली आहे. गडचिराेली-मुल मार्गावर असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिराेली व चंद्रपूर पाेलिसांनी आपापल्या हद्दीत जिल्हाबंदी नाके बसविले आहेत. मात्र हे नाके केवळ नावापुरतेच असल्याचे ‘लाेकमत’ने साेमवारी दुपारी १.३० वाजता केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. नाक्यावर असलेले पाेलीस ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना ई-पास आहे काय, कुठे चालले, काय काम आहे एवढेच विचारत हाेते. एकाही वाहनधारकाकडे ई-पास नसतानाही त्यांना साेडले जात हाेते. ई-पासशिवाय ये-जा करू दिले जात आहे. याची माहिती नागरिक एकमेकांना सांगत असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. काही युवक तर ट्रीपल सीट बसून जात हाेते तरी त्यांच्यावर काेणतीही कारवाई करण्यात आली नाही. गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाेलिसांनी जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

बाॅक्स

नदीतून जीवघेणा प्रवास

पाेलिसांच्या भीतीने काही नागरिक मुख्य मार्गाने प्रवास न करता नदीमार्गे प्रवास करीत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या बाेरमाळा घाटावरून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महिला भाजीपाला, दही विकण्यासाठी येतात. जिल्हाबंदी असली किंवा नसली तरी त्यांच्यावर काेणताच परिणाम पडत नाही. नदीमार्गे प्रवास एखादे दिवशी धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याची सीमा वैनगंगा नदीमुळे विभागल्या गेली आहे. दाेन्ही बाजूला असलेल्या गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याची पातळी कुठून कमी आहे. याची माहिती आहे. ते त्याच मार्गाने ये-जा करतात.

बाॅक्स

छत्तीसगड राज्य सीमेवर नाकाच नाही

धानाेरा तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. धानाेरा-मुरूमगाव-सावरगाव हा मुख्य मार्ग पुढे छत्तीसगड राज्यातील मानपूर शहराला जाेडतो. सावरगावजवळ दाेन्ही राज्यांची सीमा आहे. मात्र या ठिकाणी काेणताही नाका नाही. त्यामुळे दाेन्ही राज्यातील नागरिकांची खुलेआम ये-जा करणे सुरू आहे.

बाॅक्स

इतरही नाक्यांवर ढिलाच कारभार

देसाईगंज, आरमाेरी, हरणघाट, घाटकुळ, आष्टी या ठिकाणी जिल्हाबंदी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणचा कारभार ढिलाच असल्याने नागरिक खुलेआम ये-जा करीत आहेत.

बाॅक्स

ई-पास काढण्याकडे पाठ

दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. ई-पास केवळ अगदी जवळच्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार, वैद्यकीय कारण आदीच कारणांसाठी दिला जातो. मात्र नाक्यावरून खुलेआम प्रवेश दिला जात असल्याने नागरिक ई-पास काढत नसल्याचे दिसून येत आहे.