शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेवरील जिल्हाबंदी नाका नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी संचारबंदी हा सर्वाेत्तम पर्याय असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा ...

काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी संचारबंदी हा सर्वाेत्तम पर्याय असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा करण्यावर प्रतिबंध घातल्यास विविध कारणांसाठी हाेणारी गर्दी कमी हाेण्याचे प्रमाण कमी हाेईल, या उद्देशाने जिल्हा सीमाबंदी घालण्यात आली आहे. गडचिराेली-मुल मार्गावर असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिराेली व चंद्रपूर पाेलिसांनी आपापल्या हद्दीत जिल्हाबंदी नाके बसविले आहेत. मात्र हे नाके केवळ नावापुरतेच असल्याचे ‘लाेकमत’ने साेमवारी दुपारी १.३० वाजता केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. नाक्यावर असलेले पाेलीस ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना ई-पास आहे काय, कुठे चालले, काय काम आहे एवढेच विचारत हाेते. एकाही वाहनधारकाकडे ई-पास नसतानाही त्यांना साेडले जात हाेते. ई-पासशिवाय ये-जा करू दिले जात आहे. याची माहिती नागरिक एकमेकांना सांगत असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. काही युवक तर ट्रीपल सीट बसून जात हाेते तरी त्यांच्यावर काेणतीही कारवाई करण्यात आली नाही. गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाेलिसांनी जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

बाॅक्स

नदीतून जीवघेणा प्रवास

पाेलिसांच्या भीतीने काही नागरिक मुख्य मार्गाने प्रवास न करता नदीमार्गे प्रवास करीत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या बाेरमाळा घाटावरून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महिला भाजीपाला, दही विकण्यासाठी येतात. जिल्हाबंदी असली किंवा नसली तरी त्यांच्यावर काेणताच परिणाम पडत नाही. नदीमार्गे प्रवास एखादे दिवशी धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याची सीमा वैनगंगा नदीमुळे विभागल्या गेली आहे. दाेन्ही बाजूला असलेल्या गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याची पातळी कुठून कमी आहे. याची माहिती आहे. ते त्याच मार्गाने ये-जा करतात.

बाॅक्स

छत्तीसगड राज्य सीमेवर नाकाच नाही

धानाेरा तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. धानाेरा-मुरूमगाव-सावरगाव हा मुख्य मार्ग पुढे छत्तीसगड राज्यातील मानपूर शहराला जाेडतो. सावरगावजवळ दाेन्ही राज्यांची सीमा आहे. मात्र या ठिकाणी काेणताही नाका नाही. त्यामुळे दाेन्ही राज्यातील नागरिकांची खुलेआम ये-जा करणे सुरू आहे.

बाॅक्स

इतरही नाक्यांवर ढिलाच कारभार

देसाईगंज, आरमाेरी, हरणघाट, घाटकुळ, आष्टी या ठिकाणी जिल्हाबंदी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणचा कारभार ढिलाच असल्याने नागरिक खुलेआम ये-जा करीत आहेत.

बाॅक्स

ई-पास काढण्याकडे पाठ

दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. ई-पास केवळ अगदी जवळच्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार, वैद्यकीय कारण आदीच कारणांसाठी दिला जातो. मात्र नाक्यावरून खुलेआम प्रवेश दिला जात असल्याने नागरिक ई-पास काढत नसल्याचे दिसून येत आहे.