शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

जि. प.तील महाआघाडी बदलविणार अहेरीचे राजकारण

By admin | Updated: March 23, 2017 00:56 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात नवे पदाधिकारी विराजमान झाले आहेत.

आविसं, राकाँ व पालकमंत्री एकत्र : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी नवी मोटगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात नवे पदाधिकारी विराजमान झाले आहेत. मात्र भाजपला जिल्हा परिषदेची सत्ता मिळविताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आदिवासी विद्यार्थी संघाची मदत घ्यावी लागली. या नव्या समिकरणाचे अहेरी विधानसभा क्षेत्राच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आरमोरी व गडचिरोली हे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात नेहमीच राजघराण्याचे वर्चस्व राहत आले आहे. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. अम्ब्रीशरावांचा येथे थेट सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम व आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम यांच्यासोबत २०१४ मध्ये झाला. या दोघांवरही मात देत अम्ब्रीशराव विजयी झालेत. मात्र अडीच वर्षाच्या काळात आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी विधानसभा क्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणी करून आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाला तब्बल सात जागांवर यश मिळाले व दरबारी राजकारण करणाऱ्या राजे अम्ब्रीशराव आत्राम व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम या दोघांनाही शह देण्यात दीपक आत्राम यशस्वी ठरले. जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्तेची मोट बांधताना अखेरच्या क्षणी तारांबळ उडाल्याने दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाची मदत भाजपला घ्यावी लागली. ही मदत घेताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक म्हणजे त्यांचे पक्षातील अंतर्गत विरोधक अम्ब्रीशराव आत्राम यांना शह देण्याचे काम पार पाडले गेले व दीपक आत्राम यांची भाजपशी जवळीक आपल्या पुढाकारातून झाली हा संदेशही पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात खा. नेते यशस्वी ठरले आहेत. दीपक आत्राम यांच्या आविसंची मदत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला होईल, हा खा. नेते यांचा या मागचा उद्देशही यशस्वी झाल्याचे चित्र आहे. भाजपचा जनाधार अहेरी विधानसभा क्षेत्रात वाढत असताना दीपक आत्राम यांच्यासारखा नवा मित्र भाजपने आपल्या सोबतीला जोडला आहे. त्यामुळे भविष्य काळात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे काम दीपक आत्रामांच्या नेतृत्वात पुढे सुरू झाल्यास याचे आश्चर्य वाटू नये, याची भीती अम्ब्रीशराव समर्थकांना आता जाणवू लागली आहे. त्यामुळेच मंगळवारच्या या घटनाक्रमानंतर पालकमंत्री समर्थक, अनेक कार्यकर्ते दीपक आत्राम भाजपात येतील काय, अशी विचारणा करू लागले आहेत.पालकमंत्री आत्राम यांच्या अस्तित्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांना आविसंला विश्वासात घेऊनच काम करावे लागणार आहे. आविसंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पालकमंत्र्यांची पठडी वेगळी आहे. त्यामुळे दीपक आत्रामांशी जुळवून घेण्याची भूमिका त्यांनी घेतल्यास वाद निर्माण होणार नाही. अखेर पालकमंत्र्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र मोठे आहे. जिल्हा परिषदेत विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांनी सहकार्य केल्यास आविसंच्या कार्यपद्धतीवर त्यांना नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. मात्र त्यासाठी पालकमंत्र्यांना अहेरी व गडचिरोली जिल्ह्याला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांची जि. प. तील कामे आविसंच्या माध्यमातूनही करून घ्यावी लागतील. पालकमंत्री कामाला लागले, हा संदेश लोकांपर्यंत गेल्यास पालकमंत्र्यांच्या राजकारणालाही लगाम बसणार नाही. अन्यथा आविसं या भागात आता आहे त्यापेक्षा अधिक हातपाय पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही पालकमंत्र्यांसाठी धोक्याची घंटा ठरेल. (जिल्हा प्रतिनिधी)