शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

जि. प.तील महाआघाडी बदलविणार अहेरीचे राजकारण

By admin | Updated: March 23, 2017 00:56 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात नवे पदाधिकारी विराजमान झाले आहेत.

आविसं, राकाँ व पालकमंत्री एकत्र : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी नवी मोटगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात नवे पदाधिकारी विराजमान झाले आहेत. मात्र भाजपला जिल्हा परिषदेची सत्ता मिळविताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आदिवासी विद्यार्थी संघाची मदत घ्यावी लागली. या नव्या समिकरणाचे अहेरी विधानसभा क्षेत्राच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आरमोरी व गडचिरोली हे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात नेहमीच राजघराण्याचे वर्चस्व राहत आले आहे. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. अम्ब्रीशरावांचा येथे थेट सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम व आदिवासी विद्यार्थी संघाचे दीपक आत्राम यांच्यासोबत २०१४ मध्ये झाला. या दोघांवरही मात देत अम्ब्रीशराव विजयी झालेत. मात्र अडीच वर्षाच्या काळात आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी विधानसभा क्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणी करून आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाला तब्बल सात जागांवर यश मिळाले व दरबारी राजकारण करणाऱ्या राजे अम्ब्रीशराव आत्राम व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम या दोघांनाही शह देण्यात दीपक आत्राम यशस्वी ठरले. जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्तेची मोट बांधताना अखेरच्या क्षणी तारांबळ उडाल्याने दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाची मदत भाजपला घ्यावी लागली. ही मदत घेताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक म्हणजे त्यांचे पक्षातील अंतर्गत विरोधक अम्ब्रीशराव आत्राम यांना शह देण्याचे काम पार पाडले गेले व दीपक आत्राम यांची भाजपशी जवळीक आपल्या पुढाकारातून झाली हा संदेशही पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात खा. नेते यशस्वी ठरले आहेत. दीपक आत्राम यांच्या आविसंची मदत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला होईल, हा खा. नेते यांचा या मागचा उद्देशही यशस्वी झाल्याचे चित्र आहे. भाजपचा जनाधार अहेरी विधानसभा क्षेत्रात वाढत असताना दीपक आत्राम यांच्यासारखा नवा मित्र भाजपने आपल्या सोबतीला जोडला आहे. त्यामुळे भविष्य काळात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे काम दीपक आत्रामांच्या नेतृत्वात पुढे सुरू झाल्यास याचे आश्चर्य वाटू नये, याची भीती अम्ब्रीशराव समर्थकांना आता जाणवू लागली आहे. त्यामुळेच मंगळवारच्या या घटनाक्रमानंतर पालकमंत्री समर्थक, अनेक कार्यकर्ते दीपक आत्राम भाजपात येतील काय, अशी विचारणा करू लागले आहेत.पालकमंत्री आत्राम यांच्या अस्तित्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांना आविसंला विश्वासात घेऊनच काम करावे लागणार आहे. आविसंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. पालकमंत्र्यांची पठडी वेगळी आहे. त्यामुळे दीपक आत्रामांशी जुळवून घेण्याची भूमिका त्यांनी घेतल्यास वाद निर्माण होणार नाही. अखेर पालकमंत्र्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र मोठे आहे. जिल्हा परिषदेत विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांनी सहकार्य केल्यास आविसंच्या कार्यपद्धतीवर त्यांना नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. मात्र त्यासाठी पालकमंत्र्यांना अहेरी व गडचिरोली जिल्ह्याला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. आपल्या कार्यकर्त्यांची जि. प. तील कामे आविसंच्या माध्यमातूनही करून घ्यावी लागतील. पालकमंत्री कामाला लागले, हा संदेश लोकांपर्यंत गेल्यास पालकमंत्र्यांच्या राजकारणालाही लगाम बसणार नाही. अन्यथा आविसं या भागात आता आहे त्यापेक्षा अधिक हातपाय पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही पालकमंत्र्यांसाठी धोक्याची घंटा ठरेल. (जिल्हा प्रतिनिधी)