शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

साैंदर्यीकरणात भर टाकणाऱ्या फव्वारा चाैकाला घाण व अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:38 IST

देसाईगंज नगर परिषदेचे वार्षिक आर्थिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. याअंतर्गत काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात ...

देसाईगंज नगर परिषदेचे वार्षिक आर्थिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. याअंतर्गत काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात फव्वारा लावण्यात आला. यासाठी विहीर खोदून तेथे मोटारपंप बसवून फव्वाऱ्याचे अधिक सुशोभिकरण करण्यासाठी रंगीबेरंगी लाईट लावण्यात आले. मात्र सदर फव्वारा मागील अनेक वर्षांपासून बंदच असल्याने केलेल्या खर्चावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, फव्वारा चौकाच्या सभोवताल किरकोळ दुकानदार आपापली दुकानदारी थाटून आहेत. याच नादात त्यांनी चौकच गिळंकृत केला आहे. असे असले तरी पालिका प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज शहराच्या मुख्य चौकात लावण्यात आलेला फव्वारा एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा असला तरी सदर फव्वाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे यावर खर्च केलेले लाखाे रुपये वाया गेले की काय? असा सवाल नागरिक करीत आहेत. सध्या फव्वारा अखेरच्या घटका मोजत आहे. पालिका प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन फव्वारा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शहरवासिय करीत आहेत.

बाॅक्स

व्यावसायिकच टाकतात कचरा

फव्वारा चाैकात दुकाने लावणारे व्यावसायिकच येथे कचरा टाकत असल्याने सभाेवताल कचरा दिसून येताे. तसेच याठिकाणी वाढलेल्या झाडाझुडपांनी फव्वारा मशीनही कवेत घेतल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. शहरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामे, विद्युतीकरण करण्यावर भर देण्यात येत असले तरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मुख्य चौकातील फव्वाऱ्याचे पुनर्जीवित करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. फव्वारा चाैकात कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.