शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रोग व किडीमुळे धानपीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:39 IST

मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धान पिकावर कडाकरपा, तुडतुडा, बेरड, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देदमट वातावरणाचा परिणाम : डिझेल इंजिनने धान वाचविण्याची धडपड, शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धान पिकावर कडाकरपा, तुडतुडा, बेरड, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाण्याचाही दुष्काळ निर्माण झाला आहे. परिणामी धानपीक संकटात आले आहे.यावर्षी अगदी सुरूवातीपासून शेतकऱ्यांना पावसाने साथ दिली. अगदी वेळेवर पाऊस पडल्याने पऱ्हे टाकणे, धानाची रोवणी नियोजित वेळेवर झाली. रोवणीनंतरही पाऊस पडत होता. त्यामुळे धान पीक हिरवेगार धानपीक डोलत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत आहे. परिणामी दमट वातावरण निर्माण झाले आहे. दमट वातावरण किडीच्या वाढीसाठी पोषक राहते. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेताला कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे.१५ दिवसानंतर धान गर्भावस्थेत राहणार आहे. अशा स्थितीत रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास धानाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी धान निसवेपर्यंत डोलत होते. धान निसवताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगामुळे शेतकऱ्यांचे पीक करपले. काही शेतकऱ्यांनी तर धानाची कापणी सुध्दा केली नाही. मागील वर्षीची स्थिती शेतकऱ्यांना माहित असल्याने शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे. थोडाही रोग आढळून आला तरी फवारणी केली जात आहे. मात्र कधीकधी फवारणी करून सुध्दा रोग आटोक्यात येत नाही व पिकाचे नुकसान होतेवेळी बघितल्याशिवाय शेतकऱ्यासमोर कोणताही पर्याय राहत नाही. सततच्या पावसामुळे सोयाबिन, तूर, कापूस या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी धान पिकाकडून अपेक्षा बाळगूण आहे. मात्र कीड व रोगांमुळे धानाच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील अर्धी अधिक जमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने धानाच्या बांधीतील पाणी आटून भेगा पडण्यास सुरूवात झाली आहे. आणखी १५ दिवस पावसाने उसंत घेतल्यास धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी विविध साधनांच्या माध्यमातून धानपीक वाचविण्याची शर्यत करीत आहेत. काही शेतकºयांकडे सिंचन विहिरी आहेत. मात्र या विहिरीचे पाणी पुरत नसल्याने दर दिवशी एक ते दोन बांध्यांना पाणी करून पीक वाचविण्याची शर्यत केली जात आहे.कीड व रोगावरील उपायतुडतुडा रोगाच्या नियंत्रणासाठी इमेडॅप्लोप्रिट १७.८ एसएल २.५ एमएल किंवा थायामिथोक्झाम २५ डब्ल्यूजी २.५ ग्रॅम, प्रती १० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी, जैविक कीटकनाशके उपलब्ध झाल्यास त्यांची फवारणी करावी. तसेच मॅटारिजीयम अ‍ॅनिसोक्ली २.५ केजी किंवा म्युकर हॅमिलिक्स २.५ केजी प्रती हेक्टर क्षेत्रावर फवारावे. बेरड रोगाच्या नियंत्रणासाठी फिनॉलफॉस, क्लोरोफायरीफॉस फवारावी. हेक्टरी दीड टन गराडी झाडाचा हिरवा पाला जरी टाकला तरी पीक नियंत्रणात येते. शेतकºयांनी प्रकाश सापड्यांचा वापर करावा. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, जैविक किड्यांचे निरिक्षण करावे. युरीयाची मात्रा कमी प्रमाणात द्यावी.कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी डायठेन एम ४५, ३० ग्रॅम, सोबत स्ट्रेटोसायक्लिन दीड ग्रॅम, १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. सकाळी व सायंकाळी पिकाची पाहणी करावी. रोग व किटक दिसून आल्यास तत्काळ फवारणी करावी, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक (कीटकशास्त्र) डॉ. विलास तांबे यांनी केले आहे.कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्याकीटकनाशकांची फवारणी करताना कपडे, मास्क, गॉगल यांचा वापर करावा. फवारणीसाठी वापरलेले साहित्य स्वच्छ धुवून ठेवावे. फवारणी करताना कीटकनाशकाचा वास घेणे टाळावे. औषधीचे मिश्रण हाताने ढवळू नये. फवारणी करताना तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. उपाशीपोटी फवारणी करू नये. फवारणीचे काम दरदिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये. वाऱ्याच्या विरूध्द दिशेने, प्रखर उन्हात फवारणी करू नये. कीटकनाशकाच्या डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हांकडे लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह असलेली औषधी सर्वात जास्त विषारी राहते. त्याचा वापर टाळावा. फवारणी करताना अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, घाम येणे, अंधूक दिसणे, उलटी होणे, मळमळ होणे, छातीत दुखणे आदी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. कीटकनाशके डोळ्यात उडाल्यास पाच मिनिटापर्यंत डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे, असे आवाहन देसाईगंजचे मंडळ कृषी अधिकारी युगेश रणदिवे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती