शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने वैरागडवासीय त्रस्त

By admin | Updated: April 22, 2017 01:22 IST

मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या

विद्युत जनित्राचा अभाव : महावितरणच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वैरागड : मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात विद्युत पुरवठा करण्यासाठी जे विद्युत जनित्र आहेत. त्यांची संख्या कमी आहे. तसेच महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी धान पिकांसाठी आता रात्रंदिवस मोटार विद्युतपंप सुरू राहत असून कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वैरागड येथील गावाच्या सुरूवातीला रांगी-धानोराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, प्रशासकीय इमारतीच्या बाजुला एक आणि त्याच्याच बाजुला म्हणजे, पोल्ट्री फार्मजवळ व थोड्याच अंतरावर असे एकूण तीन विद्युत जनित्र उभारण्यात आले आहे. वास्तविक या ठिकाणी तीन विद्युत जनित्राची आवश्यकता नाही. चुकीचे नियोजन व नवीन विद्युत जनित्रास मान्यता नसल्याने विजेची समया निर्माण झाली आहे. येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या समस्येची रात्रंदिवस दखल घेत असले तरी वैरागड परिसरात आवश्यक असणाऱ्या क्षमतेपेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने काही दिवस तरी कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे तत्काळ यावर तोडगा काढावा, अशी मागणी वैरागडवासीयांनी केली आहे. अघोषित भारनियमनाविरोधात देसाईगंजच्या वीज कार्यालयावर नागरिक धडकले देसाईगंज : गेल्या काही दिवसांपासून देसाईगंज शहरात दररोज दोन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात तीन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. ऐन उकाड्याच्या दिवसात अघोषीत भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी देसाईगंजच्या वीज कार्यालयावर गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोर्चा काढला. राज्य शासनाने कुठलेही वीज भारनियमन जाहीर केले नसतानाही मागील एक महिन्यांपासून दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठ्याअभावी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. याशिवाय कमी दाबाची वीज समस्या शहरातील काही वार्डात आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात देसाईगंजच्या १०० नागरिकांनी कार्यालयावर धडक देऊन महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.