शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने वैरागडवासीय त्रस्त

By admin | Updated: April 22, 2017 01:22 IST

मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या

विद्युत जनित्राचा अभाव : महावितरणच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वैरागड : मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात विद्युत पुरवठा करण्यासाठी जे विद्युत जनित्र आहेत. त्यांची संख्या कमी आहे. तसेच महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी धान पिकांसाठी आता रात्रंदिवस मोटार विद्युतपंप सुरू राहत असून कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वैरागड येथील गावाच्या सुरूवातीला रांगी-धानोराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, प्रशासकीय इमारतीच्या बाजुला एक आणि त्याच्याच बाजुला म्हणजे, पोल्ट्री फार्मजवळ व थोड्याच अंतरावर असे एकूण तीन विद्युत जनित्र उभारण्यात आले आहे. वास्तविक या ठिकाणी तीन विद्युत जनित्राची आवश्यकता नाही. चुकीचे नियोजन व नवीन विद्युत जनित्रास मान्यता नसल्याने विजेची समया निर्माण झाली आहे. येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या समस्येची रात्रंदिवस दखल घेत असले तरी वैरागड परिसरात आवश्यक असणाऱ्या क्षमतेपेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने काही दिवस तरी कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे तत्काळ यावर तोडगा काढावा, अशी मागणी वैरागडवासीयांनी केली आहे. अघोषित भारनियमनाविरोधात देसाईगंजच्या वीज कार्यालयावर नागरिक धडकले देसाईगंज : गेल्या काही दिवसांपासून देसाईगंज शहरात दररोज दोन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात तीन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. ऐन उकाड्याच्या दिवसात अघोषीत भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी देसाईगंजच्या वीज कार्यालयावर गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोर्चा काढला. राज्य शासनाने कुठलेही वीज भारनियमन जाहीर केले नसतानाही मागील एक महिन्यांपासून दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठ्याअभावी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. याशिवाय कमी दाबाची वीज समस्या शहरातील काही वार्डात आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात देसाईगंजच्या १०० नागरिकांनी कार्यालयावर धडक देऊन महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.