शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
4
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
5
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
6
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
7
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
8
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
9
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
10
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
11
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
12
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
13
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
14
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
15
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
16
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
17
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
18
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
19
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
20
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने वैरागडवासीय त्रस्त

By admin | Updated: April 22, 2017 01:22 IST

मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या

विद्युत जनित्राचा अभाव : महावितरणच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वैरागड : मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात विद्युत पुरवठा करण्यासाठी जे विद्युत जनित्र आहेत. त्यांची संख्या कमी आहे. तसेच महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी धान पिकांसाठी आता रात्रंदिवस मोटार विद्युतपंप सुरू राहत असून कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वैरागड येथील गावाच्या सुरूवातीला रांगी-धानोराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, प्रशासकीय इमारतीच्या बाजुला एक आणि त्याच्याच बाजुला म्हणजे, पोल्ट्री फार्मजवळ व थोड्याच अंतरावर असे एकूण तीन विद्युत जनित्र उभारण्यात आले आहे. वास्तविक या ठिकाणी तीन विद्युत जनित्राची आवश्यकता नाही. चुकीचे नियोजन व नवीन विद्युत जनित्रास मान्यता नसल्याने विजेची समया निर्माण झाली आहे. येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या समस्येची रात्रंदिवस दखल घेत असले तरी वैरागड परिसरात आवश्यक असणाऱ्या क्षमतेपेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने काही दिवस तरी कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे तत्काळ यावर तोडगा काढावा, अशी मागणी वैरागडवासीयांनी केली आहे. अघोषित भारनियमनाविरोधात देसाईगंजच्या वीज कार्यालयावर नागरिक धडकले देसाईगंज : गेल्या काही दिवसांपासून देसाईगंज शहरात दररोज दोन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात तीन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. ऐन उकाड्याच्या दिवसात अघोषीत भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी देसाईगंजच्या वीज कार्यालयावर गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोर्चा काढला. राज्य शासनाने कुठलेही वीज भारनियमन जाहीर केले नसतानाही मागील एक महिन्यांपासून दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठ्याअभावी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. याशिवाय कमी दाबाची वीज समस्या शहरातील काही वार्डात आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात देसाईगंजच्या १०० नागरिकांनी कार्यालयावर धडक देऊन महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.