शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

अनुदान रखडल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:35 IST

निराधारांना संजय गांधी योजनेंतर्गत दरमहा अर्थसहाय्य अनुदान दिले जाते. धानोरा तालुक्यात अनेक लोकांना अनुदानाचे वाटप केले जाते. परंतु मागील तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने योजनेचे लाभार्थी बँकेत हेलपाटे मारत आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत अंध, अपंग, मतिमंद, सिकलसेलग्रस्त, कर्णबधीर, हत्तीरोग, कुष्टरोग, निराधार वृद्ध, विधवा परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके आदींना लाभ दिला जातो. प्रति माह १००० रूपये अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. परंतु धानोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही.

ठळक मुद्देतीन महिने उलटले : धानोरा तालुक्यातील निराधारांचे हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : निराधारांना संजय गांधी योजनेंतर्गत दरमहा अर्थसहाय्य अनुदान दिले जाते. धानोरा तालुक्यात अनेक लोकांना अनुदानाचे वाटप केले जाते. परंतु मागील तीन महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने योजनेचे लाभार्थी बँकेत हेलपाटे मारत आहेत.संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत अंध, अपंग, मतिमंद, सिकलसेलग्रस्त, कर्णबधीर, हत्तीरोग, कुष्टरोग, निराधार वृद्ध, विधवा परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके आदींना लाभ दिला जातो. प्रति माह १००० रूपये अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. परंतु धानोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही.अनुदान जमा होत नसल्याने लाभार्थ्यासमोर आर्थिक अडचण आहे. दसरा व दिवाळी सण सुद्धा पैशाशिवाय जाईल की काय, अशी शंका लाभार्थ्यांमध्ये आहे. धानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातून लाभार्थी धानोरा येथे आर्थिक व्यवहार करण्याकरिता येत आहेत. परंतु अनुदान बँक खात्यात जमा न झाल्याची माहिती मिळताच त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. यात त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीन महिन्याचे अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश मारभते, पुंडलिक लोणारे, ताराबाई मडावी, प्रकाश जेंगठे, दिवाकर मेश्राम, कविता सोनुले, वसंत गुरनुले, रामजी नैताम, रमेश नरचुलवार, कमान वाघाडे, अतुल शिंपी यांनी केली आहे.बँकेमध्ये लाभार्थ्यांची गर्दीयंदा अतिवृष्टीमुळे शेतातील धान व अन्य पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच शेती हंगामात शेतकऱ्याने बराचसा पैैसा खर्च केला. तसेच दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणातील बदलामुळे विविध आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. तालुक्यात अनेक गावात आजारांची साथ आहे. अशा स्थितीत उपचार करण्याकरिता पैशांची आवश्यकता लाभार्थ्यांना आहे. पैसे काढण्यासाठी निराधार योजनेचे लाभार्थी बँकेत वारंवार हेलपाटे मारून अनुदान जमा झाले की नाही, याची खात्री करीत आहेत.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन