शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

जिल्हाबंदीमुळे शेतकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. खरीपपूर्व हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली असल्याने शेतावर जाणे आवश्यक झाले आहे. मात्र ...

काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. खरीपपूर्व हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली असल्याने शेतावर जाणे आवश्यक झाले आहे. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नसल्याने शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

बाॅक्स ......

कापूस बियाणे खरेदी रखडली

चामाेर्शी तालुक्यात सर्वाधिक कापूस पिकाची लागवड हाेते. या तालुक्यातील शेतकरी कापसाची बियाणे गाेंडपिंपरी तालुक्यातून किंवा तेलंगणा राज्यातून खरेदी करून आणतात. गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत त्या ठिकाणी बियाणे स्वस्त मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने त्याच ठिकाणी बियाणे खरेदीसाठी शेतकरी जातात. मात्र यावर्षी जिल्हाबंदी असल्याने बियाणे खरेदी रखडली आहे. अनेक शेतकरी जिल्हाबंदी उठविण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

बाॅक्स .....

मागील वर्षी सातबारावर मिळत हाेता ई-पास

- मागील वर्षी याच कालावधीत जिल्हाबंदी लागू हाेती. मात्र शेतीचा हंगाम जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारावर ई-पास दिली जात हाेती. ई-पास काढण्याची प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे सातबारा धरून चाैकीजवळ जात हाेते. शेतकऱ्यांच्या हंगामाचा विचार करून पाेलीस विभागही त्यांना जाण्याची परवानगी देत हाेता. यावर्षीही अशाच प्रकारची परवानगी मिळण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहे.

- काही कर्मचारी मात्र या सातबाराचा दुरूपयाेग करून ये-जा करीत हाेते. असा दुरूपयाेग हाेणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

काेट ......

पावसाळा आता जवळ आला आहे. सर्वच शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे करीत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. त्यांची कामे ठप्प पडली आहेत. एसपी कार्यालयातून केवळ वैद्यकीय कारणासाठीच दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जात आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना ये-जा करण्याची मुभा द्यावी.- मधुकर नीलमवार, शेतकरी.

काेट .....

आमच्या परिसरातील बहुतांश शेतकरी तेलंगणा राज्यातूनच कापूस बियाणे व किटकनाशके खरेदी करून आणतात. त्याठिकाणी गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत स्वस्त दरात बियाणे व किटकनाशके उपलब्ध हाेतात. यावर्षी जिल्हाबंदी असल्याने अजुनपर्यंत बियाणे व किटकनाशके खरेदी केली नाहीत. जिल्हाबंदीतून सुट मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. - बाबुराव बट्टे, शेतकरी.