शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन भूमीचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:45 IST

दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते.

ठळक मुद्दे२९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांनी दिली होती भेट : केवळ एक विहार व बाबासाहेबांच्या पुतळ्यावरच बोळवण

अरविंद घुटके।लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते. ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला, त्या जागेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी, दीक्षाभूमी असे संबोधले जाते. शासनान जागा आरक्षित केली असली तरी या ठिकाणाचा विकास केला नाही. या ठिकाणी केवळ एक विहाराची इमारत, बाबासाहेबांचा पुतळा बांधण्यात आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आले होते. त्याकाळात देसाईगंज हे दलित चळवळीचे केंद्र बनले होते. २९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशाल जनसमुदायाला संबोधित केले होते. १४ एकर जागेचा प्रांगण नागरिकांच्या वतीने फुलून गेला होता. जागा मिळत नसल्याने घराच्या छतावर बसून बाबसाहेबांचे भाषण ऐकले होते. ज्या जागेवर बाबासाहेबांची सभा झाली, त्या जागेला सभेनंतर पदस्पर्श भूमी असे संबोधल्या जाऊ लागले. बाबासाहेबांच्या पश्चात २७ मे १९५८ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी याच भूमीवर लाखो नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून या भूमीला दीक्षाभूमी असे संबोधले जाऊ लागले. याबाबीला आता ६४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. दलित समाजाची मते घेण्यासाठी अनेक राजकीय पुढाºयांनी दीक्षाभूमीचा विकास करण्याची आश्वासने दिली आहेत. मात्र ही आश्वासने प्रत्यक्षात अजूनपर्यंत उतरली नाही. दीक्षाभूमीच्या नावावर १४ एकर जागा आहे. मात्र प्रत्यक्षात ४.६८ एवढीच जागा आता शिल्लक आहे. उर्वरित जागा गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.शिल्लक असलेली जागा तरी ताब्यात मिळावी, यासाठी स्थानिक महिलांनी पुढाकार घेतला आहे. दीक्षाभूमीचा विकास होण्यासाठी १९८३ साली सम्यक जागृत बौद्ध महिला समितीची स्थापना झाली. दीक्षाभूमीच्या विकासाकरिता सदर समितीच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत अनेकदा यासाठी पाठपुरावा केला. समिती अस्तित्वात येऊन आज ३५ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र दीक्षाभूमीचा विकास झाला नाही. दीक्षाभूमीच्या जागेवर केवळ बाबासाहेबांचा पुतळा, एक लहानसा विहार व एक विहीर एवढेच बांधकाम आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनभावना लक्षात घेऊन दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.विद्यमान सामाजिक न्यायमंत्र्यांकडून अपेक्षादीक्षाभूमीवर पदस्पर्श दिनाच्या निमित्ताने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही २९ एप्रिल रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले येणार आहेत. भाषणादरम्यान दीक्षाभूमीच्या विकासाबाबत निश्चितच घोषणा करतील. मात्र यापूर्वी अनेक नेत्यांकडून झालेल्या घोषणा ऐकून येथील नागरिकांचे कान किटले आहेत. त्यामुळे घोषणेबरोबरच प्रत्यक्ष बांधकामाची अपेक्षा येथील जनता करीत आहे.या कार्यक्रमाला आ. कृष्णा गजबे, आ. जोगेंद्र कवाडे, सीआरपीएफचे कमांडंट त्रिपाठी, नगराध्यक्ष शालू दंडवते, रोहिदास राऊत, मोतीलाल कुकरेजा, नाना नाकाडे, किसन नागदेवे, अशोक गोटेकर, बाळू खोब्रागडे, माजी आ. आनंदराव गेडाम, मारोतराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.