शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन भूमीचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:45 IST

दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते.

ठळक मुद्दे२९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांनी दिली होती भेट : केवळ एक विहार व बाबासाहेबांच्या पुतळ्यावरच बोळवण

अरविंद घुटके।लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते. ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला, त्या जागेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी, दीक्षाभूमी असे संबोधले जाते. शासनान जागा आरक्षित केली असली तरी या ठिकाणाचा विकास केला नाही. या ठिकाणी केवळ एक विहाराची इमारत, बाबासाहेबांचा पुतळा बांधण्यात आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आले होते. त्याकाळात देसाईगंज हे दलित चळवळीचे केंद्र बनले होते. २९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशाल जनसमुदायाला संबोधित केले होते. १४ एकर जागेचा प्रांगण नागरिकांच्या वतीने फुलून गेला होता. जागा मिळत नसल्याने घराच्या छतावर बसून बाबसाहेबांचे भाषण ऐकले होते. ज्या जागेवर बाबासाहेबांची सभा झाली, त्या जागेला सभेनंतर पदस्पर्श भूमी असे संबोधल्या जाऊ लागले. बाबासाहेबांच्या पश्चात २७ मे १९५८ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी याच भूमीवर लाखो नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून या भूमीला दीक्षाभूमी असे संबोधले जाऊ लागले. याबाबीला आता ६४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. दलित समाजाची मते घेण्यासाठी अनेक राजकीय पुढाºयांनी दीक्षाभूमीचा विकास करण्याची आश्वासने दिली आहेत. मात्र ही आश्वासने प्रत्यक्षात अजूनपर्यंत उतरली नाही. दीक्षाभूमीच्या नावावर १४ एकर जागा आहे. मात्र प्रत्यक्षात ४.६८ एवढीच जागा आता शिल्लक आहे. उर्वरित जागा गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.शिल्लक असलेली जागा तरी ताब्यात मिळावी, यासाठी स्थानिक महिलांनी पुढाकार घेतला आहे. दीक्षाभूमीचा विकास होण्यासाठी १९८३ साली सम्यक जागृत बौद्ध महिला समितीची स्थापना झाली. दीक्षाभूमीच्या विकासाकरिता सदर समितीच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत अनेकदा यासाठी पाठपुरावा केला. समिती अस्तित्वात येऊन आज ३५ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र दीक्षाभूमीचा विकास झाला नाही. दीक्षाभूमीच्या जागेवर केवळ बाबासाहेबांचा पुतळा, एक लहानसा विहार व एक विहीर एवढेच बांधकाम आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनभावना लक्षात घेऊन दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.विद्यमान सामाजिक न्यायमंत्र्यांकडून अपेक्षादीक्षाभूमीवर पदस्पर्श दिनाच्या निमित्ताने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही २९ एप्रिल रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले येणार आहेत. भाषणादरम्यान दीक्षाभूमीच्या विकासाबाबत निश्चितच घोषणा करतील. मात्र यापूर्वी अनेक नेत्यांकडून झालेल्या घोषणा ऐकून येथील नागरिकांचे कान किटले आहेत. त्यामुळे घोषणेबरोबरच प्रत्यक्ष बांधकामाची अपेक्षा येथील जनता करीत आहे.या कार्यक्रमाला आ. कृष्णा गजबे, आ. जोगेंद्र कवाडे, सीआरपीएफचे कमांडंट त्रिपाठी, नगराध्यक्ष शालू दंडवते, रोहिदास राऊत, मोतीलाल कुकरेजा, नाना नाकाडे, किसन नागदेवे, अशोक गोटेकर, बाळू खोब्रागडे, माजी आ. आनंदराव गेडाम, मारोतराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.