शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वन व कृषी संस्कृतीचा विकास व्हावा

By admin | Updated: February 26, 2017 01:46 IST

ज्या ठिकाणी कापसाची शेती आहे, अशाच भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत.

अभय बंग : तिसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली : ज्या ठिकाणी कापसाची शेती आहे, अशाच भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत. त्या तुलनेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी आहेत. कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या एकरूप व्हाव्या यासाठी शेतकरी नेते शरद जोशींनी प्रयत्न केले. औद्योगिक संस्कृती व तंत्रज्ञान संस्कृतीचा विकास झाला. मात्र वनसंस्कृती व कृषी संस्कृतीचा फारसा विकास झाला नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी वन व कृषी संस्कृतीचा व्हावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक डॉ. अभय बंग यांनी केले. अखिल भारतीय तिसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा येथील संस्कृती सभागृहातील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरीत शनिवारी थाटात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप, शेतकरी नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, काकासाहेब गडकरी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, देवराव पाटील म्हशाखेत्री, शालिक पाटील नाकाडे, ईश्वर मत्ते, अरविंद बोरकर, अशोक गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेली ३० वर्ष सातत्याने आंदोलन झाले. मात्र आंदोलनाचा मार्ग जेव्हा अवरूध्द होतो तेव्हा त्या-त्या आंदोलनाची पुनरावृत्ती होते. आंदोलनाला यश मिळण्यासाठी मार्ग बदलविणे गरजेचे आहे. पुनरावृत्ती टाळली पाहिजे. शेतकरी आंदोलनाला आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे डॉ. बंग म्हणाले. डॉ. शेषराव मोहिते म्हणाले, १९९० सालानंतर आपण आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासून सभोवतालच्या बदलाचा वेगही वाढला. मात्र या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणार नाही, अशीच आर्थिक धोरण राहिली. खुलीकरण आले ते उद्योगधंद्याच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. शेती क्षेत्रात खुलीकरण आलेच नाही. विकासाच्या प्रक्रियेतील अपरिहार्य ेटप्पा म्हणून खुलीकरण स्वीकारण्यात आले. मात्र राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे अन् विचारसरणीचे असोत त्यांनी या खुल्या अर्थव्यवस्थेचा शिरकाव शेती व्यवसायात होऊच दिला नाही. यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे, असे डॉ. मोहिते म्हणाले. संमेलनाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संचालन प्रा. मनिषा रिठे यांनी केले. सदर कार्यक्रमात आम्ही लटिके ना बोलू, कंसातील माणसं, माझी गझल निराळी या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी) गझलेतून शेतकरी जीवनाचे वास्तव मांडले सदर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात शेतकरी गझल मुशायराचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ईश्वर मत्ते, विनय मिरासे, श्रीनिवास गेडाम यांच्यासह अनेक कवींनी गझल सादर करून शेतकऱ्यांच्या वेदना, दु:ख व जीवनातील खरे वास्तव मांडले.