शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

धमदीटोलावासीयांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:33 IST

कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्याचे सर्वच स्रोत आटले : शेतातील विहिरीचे आणावे लागते पाणी; हातपंप खोदण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.धमदीटोला हे गाव जवळपास ३०० लोकवस्तीचे आहे. गावाच्या मध्यभागी एकमेव सार्वजनिक विहीर आहे. गावाच्या दोन्ही टोकावर हातपंप आहेत. मात्र मागील १५ दिवसांपासून सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्याचबरोबर दोन्ही हातपंपांना अत्यल्प व गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या जवळच शेतात विहीर आहे. या विहिरीतून बैलबंडी व ड्रमद्वारे पाणी आणून दैनंदिन गरज भागवावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. उन्हाळा संपण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. संपूर्ण गाव आता शेतातील विहिरीचे पाणी आणत आहे. त्यामुळे सदर विहीर सुद्धा आटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विहीर आटल्यास या गावातील नागरिकांना दुसºया गावावरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही.गावातील पाणीटंचाईची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांना देण्यात आली. त्यांनी व पं.स. सदस्य गिरीधर तितराम यांनी धमदीटोला गावाला मंगळवारी भेट दिली. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश ग्रामसेवक कोहळे यांना दिले. त्याचबरोबर कुरखेडा येथील संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांच्याशी चर्चा करून गावातील पाणीटंचाई त्यांच्या लक्षात आणून दिली.एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर या गावात दरवर्षीच पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. गावाची लोकसंख्या ३०० एवढी असतानाही गावात फक्त एक सार्वजनिक विहीर व दोेनच हातपंप आहेत. पाणीटंचाईवर आळा घालण्यासाठी या गावात पुन्हा हातपंप खोदणे आवश्यक असल्याची बाब गावकऱ्यांनी पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली.जिल्हा परिषद सदस्यांनी उपलब्ध करून दिला टॅक्टरधमदीटोला येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असल्याची बाब गावकºयांनी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी स्वत:कडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. गावकऱ्यांशी पाणीटंचाईबाबत जि.प. सदस्य कराडे व पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम यांनी चर्चा केली. गावात हातपंप खोदून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कराडे यांनी गावातील नागरिकांना दिले.गावातील पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांना विचारले असता, पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार झाला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती दिली.धमदीटोला गावात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे पाळीव जनावरे आहेत. गावातील पाण्याचे स्त्रोत आटण्याबरोबरच सभोवतालचेही पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जनावरांची सुद्धा भटकंती होणार आहे. बाहेर पाणी मिळत नाही. त्यामुळे जनावरे घरी येतात. मात्र घरी सुद्धा पाणी मिळत नसल्याने जनावरांनाही पाणीटंचाईची झळ बसणार आहे.उन्हाळा संपण्यास आणखी दोन महिने शिल्लक आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन महिन्यात पाणी समस्या आणखी गंभीर होणार आहे.