शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

धमदीटोलावासीयांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:33 IST

कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्याचे सर्वच स्रोत आटले : शेतातील विहिरीचे आणावे लागते पाणी; हातपंप खोदण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.धमदीटोला हे गाव जवळपास ३०० लोकवस्तीचे आहे. गावाच्या मध्यभागी एकमेव सार्वजनिक विहीर आहे. गावाच्या दोन्ही टोकावर हातपंप आहेत. मात्र मागील १५ दिवसांपासून सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्याचबरोबर दोन्ही हातपंपांना अत्यल्प व गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या जवळच शेतात विहीर आहे. या विहिरीतून बैलबंडी व ड्रमद्वारे पाणी आणून दैनंदिन गरज भागवावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. उन्हाळा संपण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. संपूर्ण गाव आता शेतातील विहिरीचे पाणी आणत आहे. त्यामुळे सदर विहीर सुद्धा आटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विहीर आटल्यास या गावातील नागरिकांना दुसºया गावावरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही.गावातील पाणीटंचाईची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांना देण्यात आली. त्यांनी व पं.स. सदस्य गिरीधर तितराम यांनी धमदीटोला गावाला मंगळवारी भेट दिली. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश ग्रामसेवक कोहळे यांना दिले. त्याचबरोबर कुरखेडा येथील संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांच्याशी चर्चा करून गावातील पाणीटंचाई त्यांच्या लक्षात आणून दिली.एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर या गावात दरवर्षीच पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. गावाची लोकसंख्या ३०० एवढी असतानाही गावात फक्त एक सार्वजनिक विहीर व दोेनच हातपंप आहेत. पाणीटंचाईवर आळा घालण्यासाठी या गावात पुन्हा हातपंप खोदणे आवश्यक असल्याची बाब गावकऱ्यांनी पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली.जिल्हा परिषद सदस्यांनी उपलब्ध करून दिला टॅक्टरधमदीटोला येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असल्याची बाब गावकºयांनी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी स्वत:कडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. गावकऱ्यांशी पाणीटंचाईबाबत जि.प. सदस्य कराडे व पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम यांनी चर्चा केली. गावात हातपंप खोदून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कराडे यांनी गावातील नागरिकांना दिले.गावातील पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांना विचारले असता, पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार झाला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती दिली.धमदीटोला गावात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे पाळीव जनावरे आहेत. गावातील पाण्याचे स्त्रोत आटण्याबरोबरच सभोवतालचेही पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जनावरांची सुद्धा भटकंती होणार आहे. बाहेर पाणी मिळत नाही. त्यामुळे जनावरे घरी येतात. मात्र घरी सुद्धा पाणी मिळत नसल्याने जनावरांनाही पाणीटंचाईची झळ बसणार आहे.उन्हाळा संपण्यास आणखी दोन महिने शिल्लक आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन महिन्यात पाणी समस्या आणखी गंभीर होणार आहे.