शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

देसाईगंज-आरमोरी मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: August 19, 2016 00:55 IST

देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे.

अस्तरीकरण उखडले : वाहनधारक त्रस्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष देसाईगंज/आरमोरी : देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. देसाईगंजवरून गडचिरोलीला जाण्यासाठी हा प्रमुख राज्य महामार्ग असून यामार्गावरून नेहमीच अवजड वाहने व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. देसाईगंज ते कोंढाळापर्यंत ते कोंढाळा ते कासवी फाट्यापुढील १ किमीपर्यंत या डांबरी मार्गावरचे अस्तरीकरण पूर्णत: उखडून गेल्याने मार्गाला मोठमोठ्या खाचा पडल्या आहेत. मूळ रस्त्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत लावलेले डांबराचे लेप पूर्णपणे निघून गेल्याने उंच बट्या पडल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून या मार्गावरील हे अस्तरीकरण उखडत चालले आहे. काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. देसाईगंजवासीयांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. खड्ड्यांमुळे व अस्तरीकरण निघाल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या मार्गावरून छत्तीसगडकडे जाणारे ट्रक चालत असल्याने रस्त्याची दुर्दशा आणखी वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे अवस्था बकाल झाली आहे. सदर मार्ग दुरूस्तीबाबत देसाईगंज व आरमोरी येथील अनेक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे. आरमोरीजवळ खड्ड्यांची संख्या प्रचंडप्रमाणात असल्याने एक खड्डा चुकविला तरी दुसऱ्या खड्ड्यामध्ये वाहन जाऊन पडत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे दरदिवशी शेकडो नागरिक देसाईगंज येथे येतात. येथील रेल्वेस्थानकावर उतरविलेला माल जिल्हाभरात वितरित केला जातो. त्यामुळेही वाहनांची वर्दळ वाढली आहे. खड्ड्यांमुळे अपघातही वाढले आहेत. (तालुका/शहर प्रतिनिधी)