शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

देसाईगंज-आरमोरी मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: August 19, 2016 00:55 IST

देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे.

अस्तरीकरण उखडले : वाहनधारक त्रस्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष देसाईगंज/आरमोरी : देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. देसाईगंजवरून गडचिरोलीला जाण्यासाठी हा प्रमुख राज्य महामार्ग असून यामार्गावरून नेहमीच अवजड वाहने व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. देसाईगंज ते कोंढाळापर्यंत ते कोंढाळा ते कासवी फाट्यापुढील १ किमीपर्यंत या डांबरी मार्गावरचे अस्तरीकरण पूर्णत: उखडून गेल्याने मार्गाला मोठमोठ्या खाचा पडल्या आहेत. मूळ रस्त्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत लावलेले डांबराचे लेप पूर्णपणे निघून गेल्याने उंच बट्या पडल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून या मार्गावरील हे अस्तरीकरण उखडत चालले आहे. काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. देसाईगंजवासीयांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. खड्ड्यांमुळे व अस्तरीकरण निघाल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या मार्गावरून छत्तीसगडकडे जाणारे ट्रक चालत असल्याने रस्त्याची दुर्दशा आणखी वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे अवस्था बकाल झाली आहे. सदर मार्ग दुरूस्तीबाबत देसाईगंज व आरमोरी येथील अनेक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे. आरमोरीजवळ खड्ड्यांची संख्या प्रचंडप्रमाणात असल्याने एक खड्डा चुकविला तरी दुसऱ्या खड्ड्यामध्ये वाहन जाऊन पडत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे दरदिवशी शेकडो नागरिक देसाईगंज येथे येतात. येथील रेल्वेस्थानकावर उतरविलेला माल जिल्हाभरात वितरित केला जातो. त्यामुळेही वाहनांची वर्दळ वाढली आहे. खड्ड्यांमुळे अपघातही वाढले आहेत. (तालुका/शहर प्रतिनिधी)