शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आरमोरीत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

केंद्र सरकारच्या शेतकरी व जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे केले हे कायदे रद्द ...

केंद्र सरकारच्या शेतकरी व जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे केले हे कायदे रद्द करण्यात यावे यासाठी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने अनेकवेळा चर्चा करूनही शेतकरी विरोधी कायदे रद्द केले नाही, उलट शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार दडपशाही मार्गाचा अवलंब करीत आहे.

केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे हे शेतकरी व जनविरोधी असल्याने ते रद्द करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचा कायदा करण्यात यावा, नवीन वीजबिल विधेयक रद्द करण्यात यावे, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती मागे घेण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने भारत बंदची हाक दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून भाकपा, काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा व इतर पक्षांच्या वतीने शुक्रवारी जुन्या बस्थानकाजवळ निदर्शने करण्यात आली. तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्यात आले.

आंदोलनात भाकपाचे डॉ. महेश कोपुलवार, माजी आमदार हरिराम वरखंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी, माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू अंबानी, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, शहर अध्यक्ष अमीन लालानी, काॅंग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष राजू गारोदे, जगदीश मेश्राम, नामदेव सोरते, अशोक वाकडे, चंद्रभान मेश्राम, हेमलता वाघाडे, कल्पना तिजारे, रोशनी बैस, मेघा मने, सारिका मारबते, नगरसेवक सिंधू कापकर, मयूर वनमाळी, राकेश कापकर, संजय वाकडे, नंदू खान्देशकर, विजय मुर्वतकर, शालीक पत्रे, प्रशांत खोब्रागडे, मीनाक्षी सेलोकर, विद्या मेश्राम, मीनाक्षी नैताम, आदित्य हेमके, गणेश तिजारे, अमोल दामले, साहिल मेश्राम व विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.