शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

सुकाळातील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST

वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील मोहझरी जवळील सुकाळा या फाट्यावर मागील १५ वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता ; पण ...

वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील मोहझरी जवळील सुकाळा या फाट्यावर मागील १५ वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता ; पण निकृष्ट बांधकामामुळे हा प्रवासी निवारा अल्पावधीत जीर्णावस्थेत आहे. ताे नष्ट हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्रवाशांना झाडाच्या आडोशाला उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते.

वैरागड येथून देलनवाडी, मानापूर पुढे अंगारा, मालेवाडा या गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग असून, या मार्गाला नेहमी वाहनांची वर्दळ असते. या मार्गाने आरमोरी किंवा जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोहझरी, सुकाळा व शिवणी येथील नागरिक या प्रवासी निवारा जवळ थांबून वाहनाची प्रतीक्षा करीत उभे राहतात ; परंतु या निवाराची कमालीची दुरवस्था झाली आहे. येथे प्रवाशांना बसायला योग्य अशी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल हाेत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.