शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभीजवळ उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:18 IST

गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. ...

गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. चांदाळा गावापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर कुंभी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या एक हजारच्या जवळपास आहे. कुंभी गावाला जाताना पोटफोडी नदी पडते. या नदीवर पूल नव्हता, त्यावेळी नागरिक डोंग्याने प्रवास करत होते. त्यामुळे पाईपचा पूल बांधला. मात्र, येथे उंच पुलाची गरज आहे.

तांबाशीतील रस्ता चिखलाने माखला

तळाेधी माे. : नवेगाव (रयतवारी) ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तांबाशी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चिखल पसरला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. त्यावर स्थानिक प्रशासनाने उपाययाेजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील प्रमुख रस्ता चिखलमय झाल्याची तक्रार करण्यात आली. परंतु, काहीच कार्यवाही झाली नाही.

*********************************

एका लाईनमनकडे दहापेक्षा अधिक गावांचा प्रभार

एटापल्ली : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषीपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. त्यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते तसेच एका लाईनमनकडे जवळपास १० गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत. रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्यास ताे दुसऱ्या दिवशीशिवाय सुरळीत हाेत नसल्याची गंभीर स्थिती आहे.

उमानूर-मरपल्ली मार्ग दाेन वर्षांपासून अर्धवट

अहेरी : तालुक्यातील उमानूरपासून मरपल्लीपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम सुरू करून अर्धवटच सोडण्यात आले. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम न झाल्याने नागरिकांमध्ये राेष आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उमानूर ते मरपल्लीपर्यंतचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले, तेव्हा रस्त्याच्या बाजूला कामाचे फलकही लावण्यात आले होते. मात्र, ते काम मुरुम व गिट्टी टाकून अर्ध्यावर सोडून देण्यात आले. उमानूर ते मरपल्लीपर्यंत ५ ते ६ किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी गिट्टी उखडून असल्याने रहदारीस अडचणी येत आहेत.