शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

फलक हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST

गडचिरोली : तालुक्यातील विश्रामपूर-बाम्हणी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमण करताना नागरिकांना प्रचंड त्रास ...

गडचिरोली : तालुक्यातील विश्रामपूर-बाम्हणी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमण करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या आहेत. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.

अनावश्यक फलक हटवा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी.

कार्यालयांमध्ये दस्तावेजांचा पसारा

गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाईलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या फाईल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाईलचा गट्टा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तावेजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे.

शहरातील नळांना मीटर लावण्याची मागणी

गडचिरोली : शहरातील विविध वॉर्डात अनेक नळधारकांच्या घरी नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. नळाला मीटर लावण्याची मागणी काही सूज्ञ नागरिकांनी केली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.

शासकीय विहिरींवर खासगी पंपांचा कब्जा

आरमोरी : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्राम पंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे, असा आरोप होत आहे.

अडपल्लीत फवारणी करा

गडचिरोली : नजीकच्या अडपल्ली येथील अनेक वार्डातील अनेक नाल्या साचल्या आहेत. तसेच परिसरात मोठमोठ्या खड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाॅर्डातील नागरिकांना डासांचा त्रास होत आहे. विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रवासी निवाऱ्याची गरज

गडचिरोली : गडचिरोलीवरून आरमोरी, देसाईगंज तसेच ब्रम्हपुरी, नागपूरकडे प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. मात्र आरमोरी मार्गावर प्रवासी निवारा नसल्याने त्रास होत आहे. प्रशासनाने येथे प्रवासी निवारा निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कडेलगत वाहनांची गर्दी

गडचिरोली : चामोर्शी मार्गाने सेमानाकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. दरम्यान या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला चारचाकी व दुचाकी वाहने उभ्या केल्या जातात. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना रस्ता उरत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलीस व परिवहन विभागाने वाहनावर कारवाई करावी.

ताडगाव मार्ग खड्ड्यात

अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगाव पर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले मात्र अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

निवासस्थाने ओसाड

आलापल्ली : शासनाने लाखो रूपये खर्च करून येथे कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाºयांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. त्यामुळे त्यांची अल्पावधीतच दुरवस्था हाेत असल्याचे दिसून येत आहे.

तारांमुळे वाढला धोका

आलापल्ली : शहरातील मुख्य परिसर तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्षच आहे. लाेंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिकांना धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.