शहरं
Join us  
Trending Stories
1
आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
2
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
3
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
4
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
5
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
6
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
7
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
8
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
9
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
10
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
11
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
12
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
13
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
14
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
15
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
16
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
17
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
18
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
19
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
20
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट

पालकमंत्र्यांना पदावरून हटवा

By admin | Updated: February 11, 2016 00:12 IST

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अडचणीत आहेत.

आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची मागणी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अडचणीत आहेत. येथे राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड अवहेलना होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे, कार्यवाह देवानंद वालदे, संयोजक चांगदास मसराम, आशिष बांबोळे आदींनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थेमार्फत राजे धर्मराव मुलांचे वसतिगृह नागेपल्ली येथे चालविले जाते. या वसतिगृहात बाथरूम, किचन, स्वयंपाकासाठी साहित्य नाही, मागील चार महिन्यांपासून वसतिगृहात धान्य पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. फक्त दोन किलो तांदूळ, तेल, दाळ देऊन संस्थापक तथा पालकमंत्री विद्यार्थ्यांचे शोषण करीत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. मंत्र्याच्या वसतिगृहात अशी परिस्थिती असेल तर राज्यात स्थिती किती गंभीर असावी, याची प्रचिती येते. त्यामुळे त्यांना त्वरित पदावरून दूर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.