शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईंचा बटवा अन् काेराेनाला हटवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारची उपाययाेजना व उपचार पद्धती सांगितली जात असली तरी ...

गडचिराेली : काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारची उपाययाेजना व उपचार पद्धती सांगितली जात असली तरी नागरिक पारंपरिक पद्धतीने आजीबाईंच्या बटव्यातील व निसर्गात उपलब्ध हाेणाऱ्या वनस्पती व वस्तूंचा वापर करतात. शहरासह ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या युक्त्या व उपाय केले जात आहेत. या माध्यमातून आजीबाईंचा बटवा काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी उपयुक्त ठरत असून, राेगप्रतिकारकशक्तीही वाढत आहे.

ताप, सर्दी, खाेकला आदी लक्षणे दिसल्यानंतर अनेक जण घरगुती उपाय करतात. काेराेना संसर्गात अशाच प्रकारे प्राथमिक व पूर्व उपाययाेजना म्हणून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, हळदीचा काढा, अद्रकचा रस काढून तो प्राशन केला जात आहे. मिठाच्या गुळण्यांमुळे घशात येणारे फाेड व सूज कमी हाेते, तर हळदीच्या काढ्यामुळे राेगप्रतिकारकशक्ती वाढते. अद्रकचा रस गळ्यातील कफ कमी करताे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही अनेक नागरिक अशा प्रकारच्या उपाययाेजना करताना दिसून येत आहेत; परंतु या सर्व उपाययाेजना काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वी करता येऊ शकतात किंवा साैम्य लक्षणे दिसताच अनेक जण करतात; परंतु अधिक लक्षणे आढळल्यास याेग्य वैद्यकीय सल्ला घेणेच फायद्याचे ठरते.

बाॅक्स ....

कशाचा काय फायदा?

लवंग-विलायचीचा चहा

लवंग व विलायचीमिश्रित चहामुळे व्यक्तीला याेग्य श्वास घेण्यास मदत हाेते. फुप्फुस उत्तेजक म्हणूनही अशा प्रकारचा चहा नागरिक घेतात. लवंग व विलायचीमुळे रक्ताभिसरण क्रियेतील दाेष काढण्यास याेग्य प्रमाणात मदत हाेते. आयुर्वेदात लवंग व विलायचीचे महत्त्व आराेग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.

गुळवेल-हळदीचे पेय

गुळवेल हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. गुळवेलचा काढा पिल्याने शरीरातील तापमान याेग्य राखण्यास मदत हाेते. ताप आल्यानंतर अनेक जण गुळवेलाचा काढा पितात. गुळवेल व हळद टाकून तयार केलेले मिश्रण आराेग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बऱ्या प्रमाणात गुळवेलचा उपयाेग नागरिक करतात.

तुळशीच्या पानांचा काढा

प्रत्येकाच्या अंगणात तुळस असते. आराेग्यदायी तुळस बऱ्याच प्रकारच्या आराेग्यविषयक समस्यांवर गुणकारी आहे. अँटिबायाेटिक औषधी म्हणूनही वापर केला जाताे. तुळशीची पाने खाल्ल्याने अथवा पानांचा काढा घेतल्याने गळ्यातील खवखव निघून जाते. सर्दी, खाेकल्यासारखे आजार बरे हाेतात.

बाॅक्स ...

आजीबाईंच्या बटव्यात काय?

काेट ......

खाेकल्यासाठी आमच्या घरी सर्वप्रथम सुंठ, मधाचा वापर करताे. प्राथमिक स्वरूपात आजार असताना वेळीच उपाययाेजना करीत असल्याने दवाखान्यापर्यंत जावे लागत नाही. सर्दी झाल्यानंतरही हळद, मीठ व तुळशीच्या पानांचा चहा पिताे. त्यामुळे वेळीच आजार नियंत्रणात येतो.

- सुगंधा मडावी

पावसाळ्याच्या सुरुवातीला, तसेच पावसाळ्यात अनेक आजार बळावतात. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच भुईनिंबाची पाने घरी आणून ठेवताे. ताप आल्यानंतर पानांचा काढा सकाळ व सायंकाळी दाेन वेळा एकेक कप पिल्यानंतर दाेन दिवसांतच अंगातील ज्वर निघून जाताे.

- जाईबाई देशमुख

अडूळसा, हिरडा, बेहडा आदींचा वापर ताप व खाेकल्यावर आम्ही नेहमी करताे. त्यामुळे आमच्या कुटुंबात सहजासहजी काेणत्याही आजाराचा प्रवेश हाेत नाही. जुन्या पिढीकडून मिळालेल्या औषधाेपचाराचा आमच्या कुटुंबात आजही वापर केला जात आहे. काेराेना संकट काळातही वापर करीत आहाेत.

- सीताबाई भाेयर

काेट ......

आजीबाईंच्या बटव्यातील विविध प्रकारच्या औषधी गुणधर्माच्या वनस्पती व वस्तू काेणत्याही आजाराची साैम्य लक्षणे अथवा प्रतिबंधात्मक उपाय, तसेच राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात; परंतु काेराेना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अथवा प्रकृती खालावल्यानंतर याेग्य औषधाेपचार घेणेच याेग्य ठरेल. आयुर्वेदात औषधी वनस्पतींचे महत्त्व फार असले तरी काेरानाचा संसर्ग राेखण्यासाठी काेराेनाची साखळी ताेडणे आवश्यक आहे. नियमांचे पालन, मास्कचा नियमित वापर व गृहविलगीकरणातील रुग्णांनी याेग्य उपचार व खबरदारी घेणे गरजेचे आहे. काेराेना आजारावर उपचार घेतलेल्या व्यक्तीने गृहविलगीकरणात ठराविक दिवस काढावेत. हा नियम न पाळल्यास त्याला पुन्हा इतरांपासून संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- डाॅ. हेमराज मसराम, वैद्यकीय अधिकारी, आयुष विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली.