आरमोरी : माजी आमदार तथा महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिराम वरखडे यांच्या हत्येचा कट रचणारे आरोपी नारायण धकाते व उमेश गजपुरे यांना अटक करण्यात आरमोरी पोलिसांना अपयश आले आहे. याप्रकरणी आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांना आरमोरी येथून हटविण्यात यावे अन्यथा जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वरखडे यांच्या हत्येचा कट रचणारे दोन आरोपी नारायण धकाते व उमेश गजपुरे हे मागील दीड महिन्यापासून फरार आहे. ठाणेदार ढवळे यांना त्यांना शोधण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आरमोरी येथे कर्तव्यदक्ष ठाणेदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी डॉ. मुखरू चिकराम, मंगला कोवे, दिलीप घोडाम, ओमप्रकाश मडावी, उद्धव मैंद, युवराज सपाटे, मंगर वरखडे, किर्तीलाल पुराम, सोनुदास आत्राम, रमेश कुळसंगे, मोहन भुते, नितीन कन्नाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. ठाणेदाराची बदली न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. (वार्ताहर)
आरमोरी ठाणेदाराला हटवा
By admin | Updated: November 25, 2015 04:00 IST