शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

पराभवावरही वादंगच

By admin | Updated: May 18, 2014 23:32 IST

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच

 गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार व बहुतांश नेते करीत आहे. मात्र काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा हा पराभव राज्य सरकारची नार्केता व लोकप्रतिनिधी, आमदार यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष सत्तेमुळे अंगात शिरलेला अहंकार, मतदार संघाकडे लक्ष न देता भारताच्या विविध राज्यांमध्ये वर्षातून किमान २ महिने तरी दौरा करणारे लोकप्रतिनिधी ही पराभवाची कारणे आहेत, असे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकूणच दारूण पराभवावरही काँग्रेस पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यात एक स्वर नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेस या पराभवापासून काही बोध घेईल, अशी स्थितीमात्र सध्यातरी दिसून येत नाही, अशी भावना अनेक जुन्या काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र येतात. यातील दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाला मानणारे सहयोगी अपक्ष आमदार होते. मागील चार वर्षात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी अनेक निर्णय केले. स्वतंत्र विद्यापीठ दिले, गडचिरोलीसाठी स्वतंत्र महिला रूग्णालय दिले, सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुलाचे काम सुरू केले, कोटगल, चिचडोह बॅरेजसारख्या सिंचन योजना सुरू केल्या, अनेक शासकीय इमारती उभ्या केल्या, तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामपंचायतीला दिले, बंगाली बांधवांना जमीनपट्टे दिले, असे असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार जनतेपर्यंत हे विकास कामे घेऊन जाण्यात अपयशी ठरले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचा २ लाख ३६ हजारावर अधिक मताचा पराभव झाला. यातील किमान १ लाख ८० हजार मताचा पराभव आमदारांची अ‍ॅन्टी इनकंबन्शीच्या खात्यावरच मोडणारा आहे. प्रत्येक काँग्रेस आमदाराच्या मतदार संघात किमान २५ ते ३० हजाराची माघार अशीही होणारच होती व मतदानानंतर काँग्रेस नेतेही ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाबाबत कबूल करीत होते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मतपेटी फुटल्यानंतर मोदीलाट दिसून आली. निवडणुकीत प्रचाराला फिरताना काँग्रेसच्या कुण्याही नेत्याला मोदीलाट दिसली नाही. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मोदीलाटेचा वापर आता काँग्रेसचे लोकप्रतिनिधी व नेते करीत आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकांपर्यंत लोकप्रतिनिधी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जात नाही. प्रश्न सुटो न सुटो आमदार आपल्याला भेटला याचे समाधान हे सामान्य मानसासाठी महत्वाचे आहे. हे या निकालाने काँग्रेसला सांगितले आहे. अशोक नेते यांचा मागील पाच वर्षाचा संपर्क त्यांच्या विषयासाठी महत्वाचा ठरला, ही बाब आज काँग्रेस कार्यकर्ते खासगी चर्चेतही मान्य करीत आहे. काँग्रेसचे आमदार गरीब माणसापर्यंत जातच नाही. गावपुढार्‍यांना भेटून परत येतात, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षाच्या काळात आमदारांच्या भोवती निर्माण झालेले वलय ही आर्थिक समृध्दीची साक्ष देणारा आहे. काँग्रेस पक्ष या प्रचारालाही तोंड देण्यात कमी पडला. काँग्रेस पक्षाचे खिळखिळ झालेले पक्ष संघटन पुन्हा बांधण्याची गरज आहे. बहुजन समाजाचा जिल्हाध्यक्ष असताना आजवर काँग्रेसची कधीही एवढीमोठी वाताहत झाली नाही, ही बाबही अनेक नेते व कार्यकर्ते आता बोलून दाखवित आहे. पक्ष संघटन पुन्हा योग्य लोकांच्या हातात सोपविण्याची गरज आहे. गटातटाचा विचार न करता पुन्हा तयारी करावी लागणार आहे, असे कार्यकर्ते म्हणतात.