शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पराभवावरही वादंगच

By admin | Updated: May 18, 2014 23:32 IST

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच

 गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार व बहुतांश नेते करीत आहे. मात्र काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा हा पराभव राज्य सरकारची नार्केता व लोकप्रतिनिधी, आमदार यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष सत्तेमुळे अंगात शिरलेला अहंकार, मतदार संघाकडे लक्ष न देता भारताच्या विविध राज्यांमध्ये वर्षातून किमान २ महिने तरी दौरा करणारे लोकप्रतिनिधी ही पराभवाची कारणे आहेत, असे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकूणच दारूण पराभवावरही काँग्रेस पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यात एक स्वर नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेस या पराभवापासून काही बोध घेईल, अशी स्थितीमात्र सध्यातरी दिसून येत नाही, अशी भावना अनेक जुन्या काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र येतात. यातील दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाला मानणारे सहयोगी अपक्ष आमदार होते. मागील चार वर्षात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी अनेक निर्णय केले. स्वतंत्र विद्यापीठ दिले, गडचिरोलीसाठी स्वतंत्र महिला रूग्णालय दिले, सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुलाचे काम सुरू केले, कोटगल, चिचडोह बॅरेजसारख्या सिंचन योजना सुरू केल्या, अनेक शासकीय इमारती उभ्या केल्या, तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामपंचायतीला दिले, बंगाली बांधवांना जमीनपट्टे दिले, असे असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार जनतेपर्यंत हे विकास कामे घेऊन जाण्यात अपयशी ठरले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचा २ लाख ३६ हजारावर अधिक मताचा पराभव झाला. यातील किमान १ लाख ८० हजार मताचा पराभव आमदारांची अ‍ॅन्टी इनकंबन्शीच्या खात्यावरच मोडणारा आहे. प्रत्येक काँग्रेस आमदाराच्या मतदार संघात किमान २५ ते ३० हजाराची माघार अशीही होणारच होती व मतदानानंतर काँग्रेस नेतेही ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाबाबत कबूल करीत होते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मतपेटी फुटल्यानंतर मोदीलाट दिसून आली. निवडणुकीत प्रचाराला फिरताना काँग्रेसच्या कुण्याही नेत्याला मोदीलाट दिसली नाही. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मोदीलाटेचा वापर आता काँग्रेसचे लोकप्रतिनिधी व नेते करीत आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकांपर्यंत लोकप्रतिनिधी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जात नाही. प्रश्न सुटो न सुटो आमदार आपल्याला भेटला याचे समाधान हे सामान्य मानसासाठी महत्वाचे आहे. हे या निकालाने काँग्रेसला सांगितले आहे. अशोक नेते यांचा मागील पाच वर्षाचा संपर्क त्यांच्या विषयासाठी महत्वाचा ठरला, ही बाब आज काँग्रेस कार्यकर्ते खासगी चर्चेतही मान्य करीत आहे. काँग्रेसचे आमदार गरीब माणसापर्यंत जातच नाही. गावपुढार्‍यांना भेटून परत येतात, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षाच्या काळात आमदारांच्या भोवती निर्माण झालेले वलय ही आर्थिक समृध्दीची साक्ष देणारा आहे. काँग्रेस पक्ष या प्रचारालाही तोंड देण्यात कमी पडला. काँग्रेस पक्षाचे खिळखिळ झालेले पक्ष संघटन पुन्हा बांधण्याची गरज आहे. बहुजन समाजाचा जिल्हाध्यक्ष असताना आजवर काँग्रेसची कधीही एवढीमोठी वाताहत झाली नाही, ही बाबही अनेक नेते व कार्यकर्ते आता बोलून दाखवित आहे. पक्ष संघटन पुन्हा योग्य लोकांच्या हातात सोपविण्याची गरज आहे. गटातटाचा विचार न करता पुन्हा तयारी करावी लागणार आहे, असे कार्यकर्ते म्हणतात.