शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफीचा लाभ

By admin | Updated: June 26, 2017 01:12 IST

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होईल, असा दावा मुख्यमंत्री करीत असले तरी

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : संघर्ष यात्रेने कर्जमाफी झाल्याचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होईल, असा दावा मुख्यमंत्री करीत असले तरी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या अटी व शर्ती लक्षात घेता केवळ ४० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. उर्वरित ४९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल, असा आरोप काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ३१ मार्च २०२१६ पर्यंतच्या थकित कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असेल तर या कालावधीनंतर ज्यांनी शेतीकरिता कर्ज काढले आहे, त्यांना कर्जमुक्तीचा काहीच फायदा होणार नाही, अशा शेतकऱ्यांची संख्या राज्यात १५ लाखांपेक्षा अधिक आहे. सरकारने ३४ हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली आहे. मात्र यातून काही शेतकरी कर्जमुक्त होतील. जिल्हानिहाय व बँकनिहाय सरकारने आकडेवारी जाहीर केली तर ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे काय, हे स्पष्ट होईल. मूळातच सरकारला कर्जमाफी द्यायची नव्हती, मात्र विरोधक व शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे शासनाला झुकावे लागले. विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या रेट्यामुळे सरकारला कर्जमाफी द्यावी लागली. त्यामुळे कर्जमाफी हे शेतकरी व विरोधकांच्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीसुद्धा आ. वडेट्टीवार यांनी केली आहे.