शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

राज्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफीचा लाभ

By admin | Updated: June 26, 2017 01:12 IST

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होईल, असा दावा मुख्यमंत्री करीत असले तरी

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : संघर्ष यात्रेने कर्जमाफी झाल्याचा दावा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फायदा होईल, असा दावा मुख्यमंत्री करीत असले तरी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या अटी व शर्ती लक्षात घेता केवळ ४० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. उर्वरित ४९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल, असा आरोप काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ३१ मार्च २०२१६ पर्यंतच्या थकित कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असेल तर या कालावधीनंतर ज्यांनी शेतीकरिता कर्ज काढले आहे, त्यांना कर्जमुक्तीचा काहीच फायदा होणार नाही, अशा शेतकऱ्यांची संख्या राज्यात १५ लाखांपेक्षा अधिक आहे. सरकारने ३४ हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली आहे. मात्र यातून काही शेतकरी कर्जमुक्त होतील. जिल्हानिहाय व बँकनिहाय सरकारने आकडेवारी जाहीर केली तर ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे काय, हे स्पष्ट होईल. मूळातच सरकारला कर्जमाफी द्यायची नव्हती, मात्र विरोधक व शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे शासनाला झुकावे लागले. विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या रेट्यामुळे सरकारला कर्जमाफी द्यावी लागली. त्यामुळे कर्जमाफी हे शेतकरी व विरोधकांच्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीसुद्धा आ. वडेट्टीवार यांनी केली आहे.