शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

खनिजातून कोटींचा महसूल

By admin | Updated: May 17, 2014 23:40 IST

जिल्ह्यात असलेल्या गौण खनिजाच्या माध्यमातून खनिकर्म विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात असलेल्या गौण खनिजाच्या माध्यमातून खनिकर्म विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. मागील वर्षीपेक्षा महसुलात २ कोटी १९ लाख २८ हजार रूपयाची घट झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या जास्त आहे. नदीमधून मिळणारी रेती इमारत बांधकामासाठी वापरली जाते. त्यामुळे रेतीला खनिजाएवढेच महत्व आहे. जिल्ह्यात एकूण १२० रेतीचे घाट आहेत. या घाटांचे लिलाव करून शासनाला महसूल प्राप्त होतो. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ५६ रेती घाटांचे लिलाव करण्यात आले आहेत. उर्वरित रेती घाटांचे लिलाव मात्र अजूनपर्यंत झालेले नाही. या लिलावातून खनिकर्म विभागाला ३ कोटी ६ लाख रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. पर्यावरण विभागाने रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अत्यंत कडक केली. त्यामुळे रेती घाटांचे सर्व्हेक्षण करण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होती. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर जवळपास फेब्रुवारी महिन्यात लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. रेतीचा उपसा करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने बहुतांश कंत्राटदारांनी रेती घाटांच्या लिलावात रस दाखविला नाही. त्यामुळेच १२० घाटांपैकी केवळ ५६ घाटांचा लिलाव होऊ शकला. दगड, मुरूम, वीटा, गिट्टी यांचाही गौण खनिजामध्ये समावेश होतो. यांच्या उत्खननातून जवळपास १० कोटी रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. रस्ता, पूल यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात दगड व मुरमाचा वापर केला जातो. जिल्ह्यात शेकडो मुरमाच्या खाणी आहेत. जिल्ह्यात वीटा बनविण्याचा व्यवसाय चांगला चालतो. प्रदुषणाच्या नावावर बरेच दिवस वीटा बनविण्यास परवानगी नाकारली होती. जवळपास मार्च महिन्यात वीटा बनविण्याला परवानगी दिली होती. त्यामुळे सुद्धा महसुलात घट झाली आहे. अवैधरितीने खनिज व गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणार्‍यांकडून ५७ लाख ८१ हजार ९४ रूपयाचा दंडाच्या रूपाने महसूल गोळा केला आहे. मागील चार वर्षाच्या महसूल गोळा होण्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता, २०१३-१४ या आर्थिक वर्षाचा अपवाद वगळता, दरवर्षी खनिकर्म विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २०१०-११ मध्ये ९ कोटीचे उद्दिष्ट दिले असतांना ९ कोटी ७५ लाख ३९ हजार रूपयाचा महसूल गोळा करण्यात आला. २०११-१२ मध्ये १४ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यावर्षी १६ लाख ६१ हजाराचा महसूल गोळा झाला आहे. २०१२-१३ मध्ये १३ कोटीचे उद्दिष्ट असतांना १६ कोटी ५३ लाख ३४ हजार रूपयाचा महसूल गोळा झाला. तब्बल उद्दिष्टाच्या १२७.१८ टक्के महसूल गोळा झाला. २०१३-१४ या आर्थिक वर्षात १७ कोटीचे उद्दिष्ट दिले असतांना केवळ १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपये एवढाच महसूल गोळा झाला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८४.३५ एवढे आहे. चार वर्षाच्या कालावधीमध्ये २०१२-१३ मध्ये पहिल्यांदाच उद्दिष्टापेक्षा कमी महसूल गोळा झाला आहे. (नगर प्रतिनिधी)