शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

अखंड भारताचे श्रेय सरदार पटेलांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:35 IST

भामरागड : स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतात असलेल्या पाचशेच्यावर संस्थानिक आणि राजे-रजवाड्यांना भारतात विलीन करुन सरदार पटेलांनी खऱ्या अर्थाने अखंड भारत ही ...

भामरागड : स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतात असलेल्या पाचशेच्यावर संस्थानिक आणि राजे-रजवाड्यांना भारतात विलीन करुन सरदार पटेलांनी खऱ्या अर्थाने अखंड भारत ही संकल्पना साकार केली, असे मत येथील राजे विश्वेश्वरराव कला, वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष डाखरे यांनी व्यक्त केले.

सी. पी. ॲण्ड बेरार महाविद्यालय महाल, नागपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावरील आभासी पद्धतीने एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारमध्ये मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते.

भारताला स्वातंत्र्यप्राप्ती होत असताना देशात ५६२ संस्थानिक होते. ज्यांचे एकूण क्षेत्रफळ चाळीस टक्क्यांच्या घरात होते. या सर्व संस्थानिकांना स्वतंत्र मान्यता देणे अखंड भारताच्या दृष्टीने अशक्य होते. त्यामुळेच सरदार पटेल यांनी श्रद्धा सबुरी व प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे भारतात विलीनीकरण केले. या लोहपुरुषी व्यक्तिमत्त्वामुळेच आज एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना साकार होऊ शकली, असेही ते पुढे म्हणाले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी सदैव तत्पर असायला पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. संजय पुसदकर यांनी केले.