शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गरजवंत विद्यार्थ्यांसाठी चाईल्ड केअर फंड निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:42 IST

येथील प्रेस क्लब भवनात प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा विद्द्यादानाचा प्रवास उलगडला. या प्रवासात विद्यार्थ्यांना ...

येथील प्रेस क्लब भवनात प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा विद्द्यादानाचा प्रवास उलगडला. या प्रवासात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी केलेले विविध प्रयोग कसे यशस्वी झाले, याचे रहस्यही त्यांनी उलगडले.

१९९६ मध्ये सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर गावातील जिल्हा परिषद शाळेवर सर्वप्रथम ते रुजू झाले. जळगाव (खान्देश) येथून येऊन झिंगानूरसारख्या गावात ड्युटी करणे मोठे कसरतीचे काम होते. गावात जाण्यासाठी एकच बस होती. अनेक दिवसांपर्यंत वीज पुरवठाही खंडित राहत असे. पण मनात नकारात्मकता न येऊ देता माडिया भाषा शिकली. अभिनयाची आवड असल्याने मुलांना माडियातून, अनुरूप हावभावासह शिकविण्याची स्टाईल आवडली आणि मुले जुळत गेली. त्यामुळे विद्यार्थी संख्या १२५ वरून ३०० वर गेली. त्यानंतर वेलगूर येथील शाळेत असताना शेख यांनी गुणवत्ता विकास कार्यक्रमात त्या शाळेला विभागात प्रथम आणले. विद्यार्थ्यांची बँक, कमवा-शिका, स्काऊट-गाईड युनिट आदी प्रयोगांमुळे भकास वाटणाऱ्या शाळा रमणीय होत गेल्याचे शेख यांनी सांगितले.

सध्या कार्यरत असलेल्या आसरअल्लीच्या शाळेत कॉम्प्युटरपासून विविध आधुनिक सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वृत्तपत्रांचे महत्त्व आणि कार्यपद्धती कळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ‘किड्स समाचार’ हे हस्तलिखित साप्ताहिकही ते विद्यार्थ्यांकडून बनवून घेतात.

(बॉक्स)

पालक बनून विद्यार्थ्यांशी मनाने जुळा

नैसर्गिक वातावरणात खूप चांगले शिक्षण देता येते. विद्यार्थ्यांमध्ये कमतरता नसते, फक्त त्यांना तसे घडविता आले पाहिजे. त्यांचे पालक बनून मनाने त्यांच्याशी जुळल्यास हे शक्य होते. प्राथमिक वर्गातील मुलांचे शिक्षण गंभीरपणे नसावे. ‘ॲक्टिव्हिटिबेस लर्निंग’ ही माझी कल्पना असून त्यामुळेच मुले जुळत असल्याचे ते म्हणाले.

(बॉक्स)

- शिक्षकांकडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी व्हावा

प्रशासनाकडून शिक्षक आणि सरकारी शाळांना बऱ्यापैकी चांगल्या सुविधा मिळतात. पण शिक्षकांकडील शिक्षणेतर कामांचा बोजा कमी करणे गरजेचे आहे. शिकविण्याचे काम सोडून इतर कामे, अहवाल, प्रशिक्षण, सर्वेक्षण यात शिक्षक वर्ग जास्त गुंतून राहत आहे. यामुळे मूळ कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत खुर्शिद शेख यांनी व्यक्त केली.