शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

गरजवंत विद्यार्थ्यांसाठी चाईल्ड केअर फंड निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:42 IST

येथील प्रेस क्लब भवनात प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा विद्द्यादानाचा प्रवास उलगडला. या प्रवासात विद्यार्थ्यांना ...

येथील प्रेस क्लब भवनात प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा विद्द्यादानाचा प्रवास उलगडला. या प्रवासात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी केलेले विविध प्रयोग कसे यशस्वी झाले, याचे रहस्यही त्यांनी उलगडले.

१९९६ मध्ये सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर गावातील जिल्हा परिषद शाळेवर सर्वप्रथम ते रुजू झाले. जळगाव (खान्देश) येथून येऊन झिंगानूरसारख्या गावात ड्युटी करणे मोठे कसरतीचे काम होते. गावात जाण्यासाठी एकच बस होती. अनेक दिवसांपर्यंत वीज पुरवठाही खंडित राहत असे. पण मनात नकारात्मकता न येऊ देता माडिया भाषा शिकली. अभिनयाची आवड असल्याने मुलांना माडियातून, अनुरूप हावभावासह शिकविण्याची स्टाईल आवडली आणि मुले जुळत गेली. त्यामुळे विद्यार्थी संख्या १२५ वरून ३०० वर गेली. त्यानंतर वेलगूर येथील शाळेत असताना शेख यांनी गुणवत्ता विकास कार्यक्रमात त्या शाळेला विभागात प्रथम आणले. विद्यार्थ्यांची बँक, कमवा-शिका, स्काऊट-गाईड युनिट आदी प्रयोगांमुळे भकास वाटणाऱ्या शाळा रमणीय होत गेल्याचे शेख यांनी सांगितले.

सध्या कार्यरत असलेल्या आसरअल्लीच्या शाळेत कॉम्प्युटरपासून विविध आधुनिक सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वृत्तपत्रांचे महत्त्व आणि कार्यपद्धती कळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ‘किड्स समाचार’ हे हस्तलिखित साप्ताहिकही ते विद्यार्थ्यांकडून बनवून घेतात.

(बॉक्स)

पालक बनून विद्यार्थ्यांशी मनाने जुळा

नैसर्गिक वातावरणात खूप चांगले शिक्षण देता येते. विद्यार्थ्यांमध्ये कमतरता नसते, फक्त त्यांना तसे घडविता आले पाहिजे. त्यांचे पालक बनून मनाने त्यांच्याशी जुळल्यास हे शक्य होते. प्राथमिक वर्गातील मुलांचे शिक्षण गंभीरपणे नसावे. ‘ॲक्टिव्हिटिबेस लर्निंग’ ही माझी कल्पना असून त्यामुळेच मुले जुळत असल्याचे ते म्हणाले.

(बॉक्स)

- शिक्षकांकडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी व्हावा

प्रशासनाकडून शिक्षक आणि सरकारी शाळांना बऱ्यापैकी चांगल्या सुविधा मिळतात. पण शिक्षकांकडील शिक्षणेतर कामांचा बोजा कमी करणे गरजेचे आहे. शिकविण्याचे काम सोडून इतर कामे, अहवाल, प्रशिक्षण, सर्वेक्षण यात शिक्षक वर्ग जास्त गुंतून राहत आहे. यामुळे मूळ कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत खुर्शिद शेख यांनी व्यक्त केली.