शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोरोनामुळे शिक्षण झाले ढकलगाडी; शाळेविना कागदोपत्री पास हाेतेय पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

चामाेर्शी तालुक्याची लोकसंख्या एक लाख ७९ हजार १२० (२०११च्या जनगणनेनुसार) आहे. तालुक्यात २०४ गावे आहेत. ७५ ग्रामपंचायती व ...

चामाेर्शी तालुक्याची लोकसंख्या एक लाख ७९ हजार १२० (२०११च्या जनगणनेनुसार) आहे. तालुक्यात २०४ गावे आहेत. ७५ ग्रामपंचायती व एका नगरपंचायतीचा समावेश आहे. तालुक्यात इयत्ता पहिली ते १२वीपर्यंत एकूण २८० शाळा व महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १९६ व ३ शासकीय आश्रमशाळा असे १९९ व खासगी व्यवस्थापनाच्या ८१ खासगी अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांचा समावेश आहे. आज ज्यांची मुले लहान आहेत, ती घरात राहून मोठी होत आहेत; पण बालपण न भोगता शाळेत न जाता वाढलेली ही मुले मोठी होतील तरी कशी? आज शाळेविना कागदोपत्री उत्तीर्ण झालेली ही पिढी जीवनाच्या प्रश्नांची उत्तरे कागदातच शोधू लागली, तर व्यवहाराच्या मैदानात झिरो मिळून त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही का? असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे.

आज अ, ब, क, ड आणि ए, बी, सी, डी न शिकता थेट पुढच्या वर्गात जाणारे चिमुकले आता आठवीपर्यंत तसेच ढकलत नेले जाणार आहेत. त्यांपैकी पुढे काही मुले अभियंते घडतील, काही डॉक्टर घडतील; तर काही राजकारणात जातील. हे अर्धवट ज्ञानी स्वत:सह साऱ्या समाजाचे नुकसान करतील. कोरोनामुळे तालुक्यातील हजारो मुले नर्सरीत पाऊल न ठेवताही केजी-१ मध्ये दाखल होणार आहेत. हजारो विद्यार्थी केजीमध्ये न जाता थेट पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. पहिल्या वर्गात जाण्यापूर्वी चिमुकल्यांना शालेय जीवनाची तोंडओळख व्हावी, हा पूर्वप्राथमिक शिक्षणाचा उद्देश आहे. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा आणि नर्सरीचे वर्ग भरले नाहीत. तिसऱ्या लाटेचा धाेका असल्याने चालू शैक्षणिक सत्र जसे कोरे राहिले; तसेच २०२१-२२ हेही वर्ष शाळेविना राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स

कायदा ठरला अडसर

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना वयानुसार संबंधित वर्गात दाखल करावे लागते. यंदा पहिलीचे विद्यार्थी वर्षभर शाळेत गेले नसले तरी पुढच्या सत्रात दुसऱ्या वर्गात बसविणे आवश्यक आहे. आरटीईच्या तरतुदीनुसार ही बाब अपरिहार्य असली तरी विद्यार्थ्यांना एक अक्षर न शिकविता त्याची प्रगती झाली, असे गृहीत धरणे याेग्य हाेणार नाही. चिमुकल्याचे आज झालेले शैक्षणिक नुकसान कधीच भरून निघणार नाही. त्यांचे आजचे शिकण्याचे वय निघून गेल्यावर पुन्हा त्यांना ‘त्या’ वर्गात शिकण्याची संधी नाही.