शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोरोनामुळे लग्नातील अहेरावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

लग्न सोहळ्यात सामान्य कुटुंब असले तरी किमान २५ ते ५० हजार रुपयांच्या भेटवस्तू सहज येतात. एवढेच नव्हेतर, पैशाच्या स्वरूपातही ...

लग्न सोहळ्यात सामान्य कुटुंब असले तरी किमान २५ ते ५० हजार रुपयांच्या भेटवस्तू सहज येतात. एवढेच नव्हेतर, पैशाच्या स्वरूपातही भेट दिली जाते. त्यामुळे वर-वधू यांना संसार मांडण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. मात्र लग्न सोहळ्यात किमान २५ लोकांची उपस्थिती व २ तासांत लग्न सोहळा पार पाडण्याचे बंधन असल्याने वर-वधू पक्षांकडील नातलग व इतर मंडळी लग्न सोहळ्याकडे पाठ फिरवीत सोशल मीडियावरून वर - वधूला शुभेच्छा देत आहेत. काही जणांनी लॉकडाऊनच्या काळात लग्न सोहळा न करता दिवाळीत करण्याचा निश्चय केला आहे.

लॉकडाऊन असल्याने कोणतेही सामान खरेदी करण्यासाठी दुकाने उपलब्ध नाहीत, त्यामुळे भेटवस्तू देणाऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनादिकाळापासून सुरू असलेल्या भेट प्रथेला कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही लगाम लागला आहे. नाहीतर लग्न सोहळ्यात हमखास फ्रीज, टीव्ही, कूलर, कपाट, दिवाण यासोबतच इतर किरकोळ वस्तूंची आरास लग्न मंडपात दिसून येत होती; मात्र कोरोना संकटाने लग्न सोहळ्यातून होणाऱ्या वारेमाप खर्चाची बचत झाली आहे. लॉकडाऊन कालावधीत झालेल्या लग्न सोहळ्यात बक्षीस पडले नसल्याने वर - वधू थोडे नाराज झाल्याचे चित्र आहे. तसेच लग्न सोहळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करणारे दुकानदार यांच्या व्यवसायावर मरगळ येऊन ऐन हंगामात त्यांच्यावर घरी रिकामे बसण्याची वेळ आली आहे.