शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा

By admin | Updated: June 30, 2016 01:30 IST

आपल्या सर्वांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सर्वाेत्तम गुणवत्ता असणे गरजेचे आहे.

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळागडचिरोली : आपल्या सर्वांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सर्वाेत्तम गुणवत्ता असणे गरजेचे आहे. पिण्याचे शुद्ध पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जि. प. गडचिरोली व पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जि. प. च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. जावळेकर, कृषी सभापती अजय कंकडलावार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, विकास विभागाचे उपायुक्त अनिल नवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शालिकराम धनकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. घोडमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. माळी, उपअभियंता रोडे, विशाल देशमुख आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना पालकमंत्री आत्राम म्हणाले, जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणे हे शासनाचे ध्येय आहे. गडचिरोली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील काही पाणीसाठे क्लोराईडमुळे तसेच अन्य रासायनिक प्रदूषणामुळे दूषित झाले आहेत. तेव्हा योग्य तपासणी करून सदर पाणीसाठी पिण्यासाठी बंद करावे, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा जनतेला करावा यासाठी यंत्रणांनी जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवावा, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले. याप्रसंगी जि. प. प्रशांत कुत्तरमारे म्हणाले, पिण्याचे शुद्ध पाणी अशुद्ध होण्याचे मुख्य कारण, उघड्यावर शौचविधी करणे हे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, जेणेकरून शुद्ध पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होणार नाही. संचालन जि. प. च्या नरेगा विभागाचे बीडीओ शालिकराम पडघम, प्रास्ताविक अरविंद कोडापे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता घोडमारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)