शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा

By admin | Updated: June 30, 2016 01:30 IST

आपल्या सर्वांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सर्वाेत्तम गुणवत्ता असणे गरजेचे आहे.

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळागडचिरोली : आपल्या सर्वांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सर्वाेत्तम गुणवत्ता असणे गरजेचे आहे. पिण्याचे शुद्ध पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जि. प. गडचिरोली व पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जि. प. च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. जावळेकर, कृषी सभापती अजय कंकडलावार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, विकास विभागाचे उपायुक्त अनिल नवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शालिकराम धनकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. घोडमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. माळी, उपअभियंता रोडे, विशाल देशमुख आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना पालकमंत्री आत्राम म्हणाले, जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणे हे शासनाचे ध्येय आहे. गडचिरोली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील काही पाणीसाठे क्लोराईडमुळे तसेच अन्य रासायनिक प्रदूषणामुळे दूषित झाले आहेत. तेव्हा योग्य तपासणी करून सदर पाणीसाठी पिण्यासाठी बंद करावे, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा जनतेला करावा यासाठी यंत्रणांनी जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवावा, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले. याप्रसंगी जि. प. प्रशांत कुत्तरमारे म्हणाले, पिण्याचे शुद्ध पाणी अशुद्ध होण्याचे मुख्य कारण, उघड्यावर शौचविधी करणे हे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, जेणेकरून शुद्ध पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होणार नाही. संचालन जि. प. च्या नरेगा विभागाचे बीडीओ शालिकराम पडघम, प्रास्ताविक अरविंद कोडापे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता घोडमारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)