शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गरज नसलेल्या ठिकाणी झाले बांधकाम

By admin | Updated: June 18, 2014 00:13 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या

सरकारी निधीचा अपव्यय : ५०० मीटरच्या अंतरात बांधले १३ कलवटगडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या रस्त्यात १३ कलवटाचे बांधकाम करण्यात आले. एवढ्या बांधकामाची गरज नसतानाही हे काम करण्यात आला आहे. यामध्ये केवळ पैसे खाणे यासाठीच हे काम झाले. हे अगदी सूर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट आहे. या कामाची जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी विशेष बाब म्हणून चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी हेमलकसाच्या ग्रामस्थांनी केली आहे. भामरागड या दुर्गम तालुक्यात भामरागड-आलापल्ली मार्गावर हेमलकसा गावापासून ५०० मीटर अंतराच्या रस्त्यात १३ कलवट (मोरी) बांधकाम मंजूर करण्यात आले होते. जुने चार कलवट (मोरी) असताना आता नव्या ९ मोरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदर ठिकाणी एकही नाला नाही. पावसाळ्यात पाणी वाहते अशीही परिस्थिती नाही. मग कलवट बांधायचे कशाला? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी बांधकाम प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच उपस्थित केला होता. याबाबत लोकमतने ७ मार्च २०१४ ला नागरिकांच्या माहितीनुसार वृत्तही प्रकाशित केले होते. भामरागड ग्रामपंचायत अंतर्गत हेमलकसा गावाच्या मुख्य मार्गावरून पोच रस्त्यावर ५०० मीटर अंतरात चार कलवट असताना पुन्हा ९ कलवट बांधण्याचे नियोजन करण्यात आले व गावच्या ग्रामपंचायतीने विरोध केलेला असताना हे बांधकाम रेटून पूर्ण करण्यात आले. हे कलवटाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. रस्त्यापेक्षा कलवट उंच झाले आहे. त्याच्यावरून वाहन जाणे अडचणीचे होत आहे. सायकलही जाऊ शकत नाही. गरज नसलेल्या ठिकाणी १३ कलवटे बांधून ठेवण्यात आल्यामुळे या कामात सरकारचा लाखो रूपयाचा निधी खर्च झाला आहे. या निधीतून संपूर्ण हेमलकसा गावात सिमेंट रस्ते करता आले असते. परंतु कलवटाचे बांधकाम करण्यात आले. गरज नसतानाही झालेल्या कामाचे बील काढण्यासाठी आता कंत्राटदाराची धावपळ सुरू आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे. कामाची मागणी नसताना हे कलवटाचे १३ कामे का करण्यात आले, असा ग्रामस्थांचा सवाल आहे. या संदर्भात २४ फेब्रुवारीला भामरागड ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आलापल्ली येथे पत्र देऊन कलवटाचे काम बंद करा, असे सांगितले. परंतु बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राची दखलही घेतलेली नाही, हे विशेष.