शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

गरज नसलेल्या ठिकाणी झाले बांधकाम

By admin | Updated: June 18, 2014 00:13 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या

सरकारी निधीचा अपव्यय : ५०० मीटरच्या अंतरात बांधले १३ कलवटगडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या रस्त्यात १३ कलवटाचे बांधकाम करण्यात आले. एवढ्या बांधकामाची गरज नसतानाही हे काम करण्यात आला आहे. यामध्ये केवळ पैसे खाणे यासाठीच हे काम झाले. हे अगदी सूर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट आहे. या कामाची जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी विशेष बाब म्हणून चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी हेमलकसाच्या ग्रामस्थांनी केली आहे. भामरागड या दुर्गम तालुक्यात भामरागड-आलापल्ली मार्गावर हेमलकसा गावापासून ५०० मीटर अंतराच्या रस्त्यात १३ कलवट (मोरी) बांधकाम मंजूर करण्यात आले होते. जुने चार कलवट (मोरी) असताना आता नव्या ९ मोरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदर ठिकाणी एकही नाला नाही. पावसाळ्यात पाणी वाहते अशीही परिस्थिती नाही. मग कलवट बांधायचे कशाला? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी बांधकाम प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच उपस्थित केला होता. याबाबत लोकमतने ७ मार्च २०१४ ला नागरिकांच्या माहितीनुसार वृत्तही प्रकाशित केले होते. भामरागड ग्रामपंचायत अंतर्गत हेमलकसा गावाच्या मुख्य मार्गावरून पोच रस्त्यावर ५०० मीटर अंतरात चार कलवट असताना पुन्हा ९ कलवट बांधण्याचे नियोजन करण्यात आले व गावच्या ग्रामपंचायतीने विरोध केलेला असताना हे बांधकाम रेटून पूर्ण करण्यात आले. हे कलवटाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. रस्त्यापेक्षा कलवट उंच झाले आहे. त्याच्यावरून वाहन जाणे अडचणीचे होत आहे. सायकलही जाऊ शकत नाही. गरज नसलेल्या ठिकाणी १३ कलवटे बांधून ठेवण्यात आल्यामुळे या कामात सरकारचा लाखो रूपयाचा निधी खर्च झाला आहे. या निधीतून संपूर्ण हेमलकसा गावात सिमेंट रस्ते करता आले असते. परंतु कलवटाचे बांधकाम करण्यात आले. गरज नसतानाही झालेल्या कामाचे बील काढण्यासाठी आता कंत्राटदाराची धावपळ सुरू आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे. कामाची मागणी नसताना हे कलवटाचे १३ कामे का करण्यात आले, असा ग्रामस्थांचा सवाल आहे. या संदर्भात २४ फेब्रुवारीला भामरागड ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आलापल्ली येथे पत्र देऊन कलवटाचे काम बंद करा, असे सांगितले. परंतु बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राची दखलही घेतलेली नाही, हे विशेष.