शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाॅकडाऊन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. ...

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाॅकडाऊन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कसे करायचे, याबाबत अस्पष्टता कायम आहे. असे असतानासुद्धा शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार पुढे रेटला जात आहे. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न कायम आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणेच्या वतीने दरवर्षी दहावी, बारावीची बाेर्डाची परीक्षा आयाेजित केली जाते. बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा मार्चपासून सुरू हाेत असते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या दाेन्ही परीक्षा आटाेपतात. या दाेन्ही परीक्षांच्या तारखा ठरल्या व वेळापत्रकही जाहीर झाले हाेते. मात्र, जानेवारीच्या अखेरपासून काेराेना संसर्गाचे प्रमाण वाढले. दरम्यान, शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे सर्वच विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

काेट....

इयत्ता दहावीच्या निकालाबाबत शासनाकडून अस्पष्टता आहे. विद्यार्थ्यांना गुणदान कसे करायचे, हा प्रश्न कायम आहे. शासनाने प्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा तिढा साेडवावा, त्यानंतर अकरावी प्रवेशासाठीचे नियाेजन करावे.

- प्रा. देवानंद कामडी, शिक्षक

..............................

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने आवश्यक ती पावले उचलावी. दहावी निकालाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करावे. शाळांना स्पष्ट सूचना देऊन हा विषय मार्गी लावावा.

- सुनील चंदनगीरवार, प्राचार्य

...............................

काेराेना महामारीच्या संकटाने यावर्षी शाळा तसेच अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवर परिणाम झाला. ऑनलाईनचा पर्याय पुढे आला असला तरी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अडचणीची ठरते. शासनाने दहावीच्या निकालाबाबत ठाेस निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढावा.

- विलास मगरे, शिक्षक

बाॅक्स......

अंतर्गत मूल्यमापन कसे हाेणार

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी शाळास्तरावरील अंतर्गत मूल्यमापन कसे करावे, हा प्रश्न कायम आहे. काेराेना संकटामुळे सर्व विद्यार्थी घरी बसून हाेते. ऑनलाईन अभ्यास व गृहपाठ झाला असला तरी सर्व विद्यार्थी यात समांतर भूमिकेत दिसले नाहीत. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.

बाॅक्स....

ग्रामीण भागासाठी ऑनलाईन सीईटी अडचणीची

शासनाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाऊ शकते. ही सीईटी परीक्षा ऑनलाईन झाली तर गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी अडचणीची ठरणार आहे.

बाॅक्स....

ऑफलाईन झाली तर काेराेनाचे काय?

इंटरनेट कनेक्टिव्हिटी व इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा शासनाच्या वतीने ऑफलाईन स्वरूपाची घेतली जाऊ शकते. ही परीक्षा ऑफलाईन झाल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा संपर्क एकमेकांशी येईल. परिणामी परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स....

आयटीआय, तंत्रनिकेतन प्रवेशाचे काय?

इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत असतो. काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता आयटीआय व पाॅलिटेक्निक अभ्यासक्रम निवडण्यावर भर देतात. मात्र, इयत्ता दहावीचा निकाल नेमका काेणत्या पद्धतीने लावायचा, हे अजून स्पष्ट नसल्याने आयटीआय व तंत्रनिकेतनला प्रवेश कसा मिळणार, हा प्रश्न कायम आहे. या दाेन्ही अभ्यासक्रमांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असताे.

बाॅक्स...

काय म्हणते आकडेवारी

अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा - १३,१४८

शहरातील एकूण जागा - ३,२१८