गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाॅकडाऊन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कसे करायचे, याबाबत अस्पष्टता कायम आहे. असे असतानासुद्धा शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार पुढे रेटला जात आहे. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न कायम आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणेच्या वतीने दरवर्षी दहावी, बारावीची बाेर्डाची परीक्षा आयाेजित केली जाते. बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा मार्चपासून सुरू हाेत असते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या दाेन्ही परीक्षा आटाेपतात. या दाेन्ही परीक्षांच्या तारखा ठरल्या व वेळापत्रकही जाहीर झाले हाेते. मात्र, जानेवारीच्या अखेरपासून काेराेना संसर्गाचे प्रमाण वाढले. दरम्यान, शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे सर्वच विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
काेट....
इयत्ता दहावीच्या निकालाबाबत शासनाकडून अस्पष्टता आहे. विद्यार्थ्यांना गुणदान कसे करायचे, हा प्रश्न कायम आहे. शासनाने प्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा तिढा साेडवावा, त्यानंतर अकरावी प्रवेशासाठीचे नियाेजन करावे.
- प्रा. देवानंद कामडी, शिक्षक
..............................
दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने आवश्यक ती पावले उचलावी. दहावी निकालाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करावे. शाळांना स्पष्ट सूचना देऊन हा विषय मार्गी लावावा.
- सुनील चंदनगीरवार, प्राचार्य
...............................
काेराेना महामारीच्या संकटाने यावर्षी शाळा तसेच अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवर परिणाम झाला. ऑनलाईनचा पर्याय पुढे आला असला तरी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अडचणीची ठरते. शासनाने दहावीच्या निकालाबाबत ठाेस निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढावा.
- विलास मगरे, शिक्षक
बाॅक्स......
अंतर्गत मूल्यमापन कसे हाेणार
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी शाळास्तरावरील अंतर्गत मूल्यमापन कसे करावे, हा प्रश्न कायम आहे. काेराेना संकटामुळे सर्व विद्यार्थी घरी बसून हाेते. ऑनलाईन अभ्यास व गृहपाठ झाला असला तरी सर्व विद्यार्थी यात समांतर भूमिकेत दिसले नाहीत. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.
बाॅक्स....
ग्रामीण भागासाठी ऑनलाईन सीईटी अडचणीची
शासनाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाऊ शकते. ही सीईटी परीक्षा ऑनलाईन झाली तर गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी अडचणीची ठरणार आहे.
बाॅक्स....
ऑफलाईन झाली तर काेराेनाचे काय?
इंटरनेट कनेक्टिव्हिटी व इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा शासनाच्या वतीने ऑफलाईन स्वरूपाची घेतली जाऊ शकते. ही परीक्षा ऑफलाईन झाल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा संपर्क एकमेकांशी येईल. परिणामी परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स....
आयटीआय, तंत्रनिकेतन प्रवेशाचे काय?
इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत असतो. काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता आयटीआय व पाॅलिटेक्निक अभ्यासक्रम निवडण्यावर भर देतात. मात्र, इयत्ता दहावीचा निकाल नेमका काेणत्या पद्धतीने लावायचा, हे अजून स्पष्ट नसल्याने आयटीआय व तंत्रनिकेतनला प्रवेश कसा मिळणार, हा प्रश्न कायम आहे. या दाेन्ही अभ्यासक्रमांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असताे.
बाॅक्स...
काय म्हणते आकडेवारी
अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा - १३,१४८
शहरातील एकूण जागा - ३,२१८