शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी शहरातही काँग्रेस माघारली

By admin | Updated: May 19, 2014 23:31 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या मोठे गाव असलेल्या आरमोरी गावात काँग्रेसला अत्यल्प मतदान मिळाले आहे.

आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या मोठे गाव असलेल्या आरमोरी गावात काँग्रेसला अत्यल्प मतदान मिळाले आहे. भाजपने येथे ४ हजार ५८७ मताची आघाडी घेतली आहे. आरमोरी गावात १४ मतदान केंद्र होते. या सर्व मतदान केंद्रांवर भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. आरमोरी शहरात भाजपला ६ हजार २८४ मत मिळाले. तर काँग्रेस उमेदवाराला १ हजार ६९७ मते मिळाली. भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या उमेदवाराला ४५०, बहूजन समाज पार्टीच्या उमेदवाराला ६२९ तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला ३३७ मते मिळाली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात मागील १० वर्षापासून काँग्रेसचे आमदार आहेत ते आरमोरी गावातच राहणारे आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवणार्‍या काँग्रेसच्या सहकार गटाचेही मोठे जाळे आरमोरी गावात पसरलेले आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे १३ सदस्यीय आरमोरी ग्रामपंचायतीची सत्ता भारतीय कम्युनिष्ट पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीची आहे. आरमोरी जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचा सदस्य आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाला केवळ १६९७ मते मिळाली आहे. भाजपने येथे ४ हजार ५८७ मताची आघाडी मिळविली. मोदी लाट काँग्रेसविरोधी असलेला असंतोष, आमदारांविषयी असलेली नाराजी, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे या गावात काँग्रेसचे पानिपत झाले. असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तुलनेत भाजपला शिवसेनेची या निवडणुकीत मिळालेली मोठी साथ याशिवाय युवाशक्ती आघाडीचीही झालेली सोबत भाजपसाठी मोठी महत्वाची बाब ठरली. आरमोरी शहरात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणी बुथवर योग्य नियोजन केल्याने मतदान त्यांच्याकडे अधिक प्रमाणात वळते झाले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात तालुक्याच्या ग्रामीण भागातही भाजपने प्रचंड मुसंडी मारली आहे. वैरागड येथे चार मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्राववर भाजप आघाडीला मोठे मतदान मिळाले आहे. वैरागडात १ हजार ५४०, काँग्रेस उमेदवाराला ५३४ मते मिळाले आहे. वैरागडच्या एका मतदान केंद्रावर तर काँग्रेस उमेदवारापेक्षा बसपाचा उमेदवार आघाडीवर आहे. माजी आमदार राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिराम वरखडे यांच्या जोगीसाखरा गावात दोन मतदान केंद्र आहे. येथे भाजपला ६२३ मत मिळाले आहे तर काँग्रेसला ३०५ मते मिळाले आहे. इंजेवारी या मोठ्या गावात भाजपला ५०० तर काँग्रेसला ३८४ मत मिळाले आहे. ठाणेगावमध्येही तीन मतदान केंद्र आहे. येथे भाजपला १ हजार ३०६ तर काँग्रेसला ३१३ मते मिळाले आहे. चुरमुरा गावात काँग्रेसला १८५, भाजपला ४८० मते मिळाली आहे. आरमोरी तालुक्यातील दवंडी या गावात मात्र काँग्रेसला ३२९ व भाजपला १६०, भाकरोंडीमध्ेय काँग्रेसला २९१, भाजपला २६२ मतदान आहे. मुरमाळी येथेही काँग्रेसला ३०४ तर भाजपला १८४ मते मिळाले आहेत. अनेक मतदान केंद्रावर भाजपला दुहेरी आकड्यातील मतदानच मिळाले आहे. एकूण संपूर्ण तालुक्याची व आरमोरी गावाची मताधिक्य पाहिली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस या मतदार संघामध्ये १४ हजारावर अधिक मतांनी पिछाडीवर होती. या वर्षीच्या निवडणुकीतही ४३ हजार मतांनी काँग्रेसला दणका मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसने आता नव्याने निवडणुकीसाठी तयारी करावी लागणार आहे, असे जाणकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मोदीच्या लाटेत डाव्या पक्षाला आरमोरी गावासह मतदार संघातही प्रचंड फटका बसल्याचे भाकप उमेदवाराच्या मिळालेल्या ताधिक्यावरून दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे बर्‍यापैकी प्राबल्य आहे. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनेक क्षेत्रात कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार तिसर्‍या स्थानावर होते. पक्षाच्यावतीने गावपातळीपर्यंत आंदोलने करून वृध्द लोकांनाही अनेक योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले. मात्र निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. (प्रतिनिधी)