शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची शासकीय स्तरावरुन अद्यापही दखल घेण्यात ...

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची शासकीय स्तरावरुन अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याने या प्रती जनमानसात आक्रोश आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर प्रचंड वाढवण्यात आल्याने यासोबतच जीवनावश्यक वस्तूचेही भाव तडकले आहेत. यामुळे देशातील जनता दारिद्र्याकडे वळू लागली. देशातील नागरिकांची, शेतकऱ्यांची पर्वा न करता मनमर्जीने दरवाढ व तीन काळे कृषी कायदे करणाऱ्या सरकार विरोधात आंदोलन करणे भाग पडू लागले आहे.केंद्र शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गरिबांच्या कल्याणासाठी उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.गरीब,मध्यम व शेतकरी वर्गाला अल्प दरात गॅस वितरीत केले होते. परंतु वर्तमान स्थितीत पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती पाहता शासन गरिबांचे कोणते कल्याण करीत आहे, हे न समजण्यापलीकडचे आहे. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी पारित केलेले तीन काळे कायदे तत्काळ रद्द करुन देशातील जनतेचे रक्षण करणेस्तव उचित उपाययोजना करण्याकरीता केंद्र शासनाला निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनातून केली आहे.

निवेदन उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी स्वीकारले. यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले, उपाध्यक्ष नितीन राऊत, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकू बावणे, विलास ढोरे, अरुण कुंभलवार, विलास भागडकर, रमेश मेश्राम, राजेश गायकवाड, दादाजी वालदे, जगदीश शेंद्रे ,रामदास सहारे आदी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.