शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची शासकीय स्तरावरुन अद्यापही दखल घेण्यात ...

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची शासकीय स्तरावरुन अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याने या प्रती जनमानसात आक्रोश आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर प्रचंड वाढवण्यात आल्याने यासोबतच जीवनावश्यक वस्तूचेही भाव तडकले आहेत. यामुळे देशातील जनता दारिद्र्याकडे वळू लागली. देशातील नागरिकांची, शेतकऱ्यांची पर्वा न करता मनमर्जीने दरवाढ व तीन काळे कृषी कायदे करणाऱ्या सरकार विरोधात आंदोलन करणे भाग पडू लागले आहे.केंद्र शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गरिबांच्या कल्याणासाठी उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.गरीब,मध्यम व शेतकरी वर्गाला अल्प दरात गॅस वितरीत केले होते. परंतु वर्तमान स्थितीत पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती पाहता शासन गरिबांचे कोणते कल्याण करीत आहे, हे न समजण्यापलीकडचे आहे. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी पारित केलेले तीन काळे कायदे तत्काळ रद्द करुन देशातील जनतेचे रक्षण करणेस्तव उचित उपाययोजना करण्याकरीता केंद्र शासनाला निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनातून केली आहे.

निवेदन उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी स्वीकारले. यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले, उपाध्यक्ष नितीन राऊत, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकू बावणे, विलास ढोरे, अरुण कुंभलवार, विलास भागडकर, रमेश मेश्राम, राजेश गायकवाड, दादाजी वालदे, जगदीश शेंद्रे ,रामदास सहारे आदी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.