शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची शासकीय स्तरावरुन अद्यापही दखल घेण्यात ...

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची शासकीय स्तरावरुन अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याने या प्रती जनमानसात आक्रोश आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर प्रचंड वाढवण्यात आल्याने यासोबतच जीवनावश्यक वस्तूचेही भाव तडकले आहेत. यामुळे देशातील जनता दारिद्र्याकडे वळू लागली. देशातील नागरिकांची, शेतकऱ्यांची पर्वा न करता मनमर्जीने दरवाढ व तीन काळे कृषी कायदे करणाऱ्या सरकार विरोधात आंदोलन करणे भाग पडू लागले आहे.केंद्र शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गरिबांच्या कल्याणासाठी उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.गरीब,मध्यम व शेतकरी वर्गाला अल्प दरात गॅस वितरीत केले होते. परंतु वर्तमान स्थितीत पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती पाहता शासन गरिबांचे कोणते कल्याण करीत आहे, हे न समजण्यापलीकडचे आहे. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी पारित केलेले तीन काळे कायदे तत्काळ रद्द करुन देशातील जनतेचे रक्षण करणेस्तव उचित उपाययोजना करण्याकरीता केंद्र शासनाला निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनातून केली आहे.

निवेदन उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी स्वीकारले. यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले, उपाध्यक्ष नितीन राऊत, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकू बावणे, विलास ढोरे, अरुण कुंभलवार, विलास भागडकर, रमेश मेश्राम, राजेश गायकवाड, दादाजी वालदे, जगदीश शेंद्रे ,रामदास सहारे आदी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.