शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

देसाईगंज नगर परिषदेच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण

By admin | Updated: May 1, 2016 01:16 IST

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली. राज्य निर्मितीनंतर एकाच वर्षाने ...

कमी लोकसंख्येची नगर परिषद म्हणून परिचित : १ मे १९६१ मध्ये देसाईगंज ग्रा. पं. चे रूपांतरदेसाईगंज : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली. राज्य निर्मितीनंतर एकाच वर्षाने स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या मागणीला होकार देत तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे १९६१ ला वडसा ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर केले. तत्कालीन परिस्थितीनुसार केवळ ५ ते ७ हजार लोकसंख्या असलेली नवीन नगर परिषद चंद्रपूर जिल्ह्यात नावारूपास आली. सर्वात कमी लोकसंख्येची नगरपरिषद म्हणून देसाईगंजची तेव्हा ओळख निर्माण झाली होती़ रविवार १ मे २०१६ ला देसाईगंज नगर परिषदेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी सी. पी. अ‍ॅन्ड बेरार काळात जुन्या मध्यप्रदेश राज्याचा एक भाग होता. मध्यप्रदेश राज्याचे आयुक्तालय चंद्रपूरस्थित होते. चंद्रपूरचे तत्कालीन सहआयुक्त सी. सी. देसाई यांनी १९३३ मध्ये देसाईगंज शहराची स्थापना केली. केवळ ५ ते ७ हजार लोकसंख्येच्या वडसा व नैनपूर ग्रामपंचायतीच्या विलिनीकरणातून १ मे १९६१ साली देसाईगंज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली़ वडसा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर हरबाजी हटवार यांचे सी. सी. देसाई यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते़ एकदा देसाई शहरात भेटीदरम्यान आल्यावर शहराला मध्यवर्ती स्थान व रेल्वेस्थानक तसेच धानाची मोठी आवक असल्यामुळे भविष्यात येथे मोठी बाजारपेठ तयार होऊ शकते, यासाठी स्थानिकांनी प्रयत्न करण्याचा सल्ला देसाई यांनी दिला होता. त्याला अनुसरूनच हरबाजी हटवार, बिडी ठेकेदार हाजी अब्दुल रफी यांनी प्रयत्न चालविले़ १९३३ साली हाजी अब्दुल रफी यांच्या अध्यक्षतेखाली सहआयुक्त सी. सी. देसाई यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून सहआयुक्त सी. सी. देसाई यांच्या नावाने देसाईगंज शहराची कोनशिला ठेवली़ यावेळी हरबाजी हटवार हे सचिव म्हणून मंचकावर हजर होते़ वडसा रेल्वेस्थानकाला देसाईगंज म्हणून नवीन नाव मिळाले़ देसाईगंज हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथून सगळीकडेच व्यापाराची जडणघडण होऊ लागली़ ग्यानचंद शर्मा, अ‍ॅड. ग. म. हटवार व अन्य नागरिकांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर लगेच एका वर्षाने १ मे १९६१ ला वडसा व नैनपूर ग्रामपंचायत विलिन करून देसाईगंज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली़ चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीयस्तरावर ग्यानचंदजी शर्मा यांची तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून नेमणूक केली़ १ मे १९६१ ते १८ डिसेंबर १९६२ पर्यंत ते नगराध्यक्ष होते़ शासकीय नियुक्ती असल्यामुळे त्यांची नियुक्ती खारिज करून १९६२ साली नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक घेण्यात आली़ अ‍ॅड. ग. म. हटवार यांनी शहरातील १३ जागांपैकी १२ जागांवर आपला कब्जा केला़ सर्वसंमतीने अ‍ॅड. ग. म. हटवार हे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बनले़ हाती सत्ता आल्यावर केवळ १७०० रूपये हातात घेऊन नगरपरिषदेचा कारभार सुरू झाला़ तेव्हा शहराची लोकसंख्या केवळ ५ ते ७ हजार होती़ नगरपरिषदेचा वर्षाचा बजेट केवळ ५० हजार रूपयांचा राहत होता. सध्या देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजारावर पोहोचली आहे़ एका वर्षाचा बजेट ५ कोटींवर घ्यावा लागत आहे. सन १९६४ मध्ये शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. तेव्हा नगरपरिषदेकडे नळयोजनेसाठी भरावयास लागणारी रक्कम १९ हजार रूपये देखील नव्हते. निवडून आलेल्या सभासदांनी वर्गणी काढून ती रक्कम जमा केली. शासनाच्या विविध अनुदानातून शहरात विकासात्मक कामे होत गेली़ सन १९९१ ते १९९६ च्या काळात शहरात अग्नीशमन वाहन, रूग्णवाहिका आली़ तसेच शहरात विविध विकासकामे होत आहेत. शहरातील रस्ते, नाली यांचे बांधकाम करण्यात आले. शहरात दुतर्फा पथदिव्यांची सोय, क्रीडा संकूल सभागृह तयार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात भरभराटीस आले असलेली नगरपरिषद म्हणून देसाईगंज पालिका नावारूपास आली आहे. (वार्ताहर)