शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंद

By admin | Updated: August 3, 2014 00:06 IST

अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात

अहेरी : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मुलचेरा, भामरागड तालुक्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मुलचेरा, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुका मुख्यालयाचे अंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून मोठे आहे. यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या चारही तालुक्यात उद्योग, सिंचन, विद्युत, शिक्षण, आरोग्य व बेरोजगारीची समस्या आहे. यामुळे या तालुक्यातील नागरिक विकासापासून तसेच शासकीय योजनांपासून वंचित आहेत. विकासासाठी अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, असा निर्धार करून या परिसरातील नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. शासनाने यापूर्वी वाशिम, नंदूरबार, गोंदिया आदी जिल्ह्याची निर्मिती केली. तसेच नुकताच पालघर जिल्हा घोषित केला. त्यामुळे आता १५ आॅगस्टपर्यंत अहेरी जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अहेरी येथे मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. आॅटो चालकांनी आॅटो रिक्षा वाहतूक बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील देवलमरी येथेही आॅटो रिक्षा व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. अहेरी येथील बंद आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, अतुल उईके, विलास रापर्तीवार, पवन कोसरे, अजय चौधरी, मनोज मडावी, श्रीनिवास मेश्राम, मुकेश कोसरे, सुरज कोसरे यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुलचेरा येथील बंदमध्ये बादल शहा, सुभाष दलपती, मनोज कर्मकार, रवी दुर्गे, शंकर हलदार, ओपू मुजूमदार, दीपक परचाके, गणेश बंकावार, दिनेश पेंदाम, नरेश मलिक, वीजू डोर्लीकर, कृष्णा हलदार, बुद्धी विश्वास, मांतेश पाल, बासू घरोधर, राबीन शहा, निखिल ईज्जतदार, सुभाष पाल तसेच भामरागड येथे झालेल्या आंदोलनात आशिफ सुफी, प्रदीप कर्माकार, ज्योतींदा डे, अक्रमखान पठाण, बहादूर आलाम, चित्तरंजन बाला, रहेमान शेख, संतोष बडगे, रमेश मारगोनीवार आदींसह शेकडो नागरिक उपस्थित झाले होते.शुक्रवारी जिल्हाभरात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. मात्र सणाच्या दिवशीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला अहेरी, मुलचेरा, भामरागड आदी तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)