शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

महर्षी वाल्मिकीच्या पालखीने शहर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:31 IST

जय वाल्मिकी केवट/ढिवर मंडळ चामोर्शीच्या वतीने बुधवारी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव तथा समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी मंदिर चौकातून शहरातून महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देचामोर्शीत जयंती उत्सव व समाज प्रबोधन मेळावा : शहर व तालुक्यातील केवट, ढिवर, भोई समाज एकवटला

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जय वाल्मिकी केवट/ढिवर मंडळ चामोर्शीच्या वतीने बुधवारी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव तथा समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी मंदिर चौकातून शहरातून महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीने अख्खे चामोर्शी शहर दुमदुमले.केवट/ढिवर (भोई) समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी यांची पालखी व मिरवणूक स्थानिक मच्छीमार्केटमधून वाळंवटी चौक, मुख्य बाजारपेठ, तेलंग मोहल्ला, राममंदिर, माता मंदिरमार्गाने काढण्यात आली. त्यानंतर सदर पालखीचा समारोप चौकातील महर्षी वाल्मिकी मंदिरात करण्यात आला.मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर बुधवारी १२ वाजता समाप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर दुपारी ३.३० वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.समाजप्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रज्ञा उराडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी बी.जे.सातार, न.पं.च्या महिला व बालकल्याण सभापती मंदा सरपे, नगरसेविका कविता किरमे, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव बावणे, सेवानिवृत्त उपकार्यकारी अधिकारी काशिनाथ दुमाने, सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी एन.डी.मेश्राम, माजी उपव्यवस्थापक विजय घुग्गुसकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी जी.व्ही.डोंगरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष लोमेश बुरांडे, पोलीस पाटील यामिनी भोयर, हरीष गेडाम, सुरेश गट्टे, महादेव कोसमशिले, मच्छींद्र सातारे, कान्हू कोसमशिले, राजू राऊत, विलास महामंडरे, बंडू राऊत, विलास सरपे, मंगेश सातारे, आनंद सरपे, विठ्ठल शिंदे, नारायण कस्तुरे, अतुल कस्तुरे, शीतल शिंदे, मंदा मंडरे, सुनीता सरपे, गयाबाई राऊत, गीता गट्टे, ललीता वाघाडे, राईबाई कोसमशिले, लता महामंडरे, चंद्रकला सातारे, कविता राऊत, शशी सातारे, सुमित्रा शिंदे, वनमाला सरपे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार मंडळ अधिकारी सुभाष सरपे यांनी केले. विशेष म्हणजे केवट/ढिवर समाजाच्या वतीने यंदा पहिल्यांदाच शहरातून महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधवांनी सहकार्य केले.समाजबांधवांनी संघटित राहण्याचे आवाहनमहर्षी वाल्मिकी जयंती उत्सव तथा प्रबोधन मेळाव्यात नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, उपाध्यक्ष राहुल नैताम, सेवानिवृत्त बीडीओ बी.जे.सातार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समाजातील विविध प्रश्न व समस्या शासनदरबारी मार्गी लावायचे असेल तर समाज संघटीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवट/ढिवर (भोई) समाजाने कायम संघटीत राहून शासनदरबारी लढा दिला पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी केले.समाजाच्या वतीने अशाप्रकारचे प्रबोधन मेळावे दरवर्षी आयोजित केले पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी केले.यंदा प्रथमच चामोर्शी शहरातील केवट समाजाने एकत्र येऊन मेळावा घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने या समाजाने आपली ताकद दाखविली. ही ताकद अशीच कायम राहिली पाहिजे, जेणे करून आपले अधिकार व हक्क मिळविण्यास सोयीचे होईल. तेव्हा सर्व समाजबांधवांनी आपसातील मतभेद दूर करून समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असे अनेक मान्यवरांनी सांगितले.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, त्यामुळे समाजातील युवकांनी उच्च शिक्षणाकडे वळावे, असे आवाहन नगराध्यक्ष उराडे यांनी यावेळी केले.