शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

चामोर्शी शहरात विजेचा लपंडाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:36 IST

गेल्या महिनाभरापासून विजेचे दिवस व रात्रीला अनेकवेळा जाणे-येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे ...

गेल्या महिनाभरापासून विजेचे दिवस व रात्रीला अनेकवेळा जाणे-येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने व लॉकडाऊन असल्याने बहुतांश नागरिक घरीच राहणे पसंत करीत आहेत. अशातच अधूनमधून विद्युत पुरवठा खंडित होत असून सध्या उकाडा जास्त असल्याने नागरिक उकाड्याने त्रासून गेले आहेत. तसेच दुकानदार व इतर व्यावसायिक या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत.

१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसामुळे चामोर्शी शहराच्या काही वाॅर्डातील विद्युत पुरवठा रात्रभर पूर्णपणे बंद होता. त्यामुळे रात्रभर डासांचा त्रास सहन करावा लागला. तसेच गावांमधील विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. चामोर्शी शहरात १५ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे जवळपास पाच ते सहा तास विद्युत पुरवठा खंडित झाला. पाऊस येऊन निघून गेल्याने उकाड्याच्या वातावरणात डासांच्या त्रासाने नागरिक विद्युत पुरवठा सुरू होईपर्यंत झोपू शकले नाहीत. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात होत असलेला विजेचा लपंडाव बंद करण्यात यावा व तांत्रिक अडचणी दुरुस्त करून नियमित वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.