शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

Vidhan Sabha Election 2019; गडचिरोलीतील नागरिकांचे म्हणणे, दारु पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 17:20 IST

विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.

ठळक मुद्देदारूमुक्त निवडणुकीसाठी १२० ग्रामपंचायतींचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.गडचिरोलीत गेल्या तीन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांना दारूचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६०० गावांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात दारूला थारा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १२० ग्रामपंचायतींनी विधानसभा निवडणूकसुद्धा दारूमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.गावकऱ्यांनी केलेल्या ठरावांमध्ये मुख्यत: तीन मुद्दे मांडले आहेत. त्यात राजकीय पक्षांनी उमेदवार देताना तो दारू पिणारा नसावा, उमेदवारांनी मतांसाठी दारू वाटू नये आणि मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये या मुद्यांचा समावेश आहे. हे ठराव सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हा आणि प्रदेश अध्यक्षांकडे पाठविले असल्याचे डॉ.बंग यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी गडचिरोली-चिमूर मतदार संघातील पाचही उमेदवारांनी मतदारांना दारूचे वाटप करणार नाही अशी लेखी हमीच दिली होती. त्याचा बराच परिणामही दिसून आला. यावेळीही जे उमेदवार राहतील त्यांच्याकडून ही हमी घेण्याचा प्रयत्न मुक्तिपथकडून केला जाणार आहे.

जनभावनेचा आदर करावा- डॉ.बंगग्रामसभांनी अशा पद्धतीचे ठराव घेऊन निवडणुकीत दारूपासून दूर राहण्याचा निर्णय घेणे हा लोकशाहीचा विजय आहे. केवळ गडचिरोली जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी याचा आदर्श घेतला पाहीजे. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी जनभावनेचा आदर करत योग्य उमेदवार निवडणुकीत उतरवावे, असे आवाहन मुक्तिपथ अभियानाचे मार्गदर्शक आणि ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी केले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019