शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या पाळीचे काम बंद केल्याने नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:58 IST

चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देनिवेदन । तीन प्रभागातील नागरिकांची एसडीओ कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी विजया जाधव यांनी स्वीकारले. तर नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी संजय गंगथडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना पी. जे. सातार, एच. डब्ल्यू. उत्तरवार, कोपेश्वर लडके, एस. एस. घागरे, व्ही. एन. सालेकर, आर. जी. वासेकर, के. डी. बोबाटे, आर. एन. धोडरे, संजय कुनघाडकर, महेंद्र वासेकर, कालिदास बुरांडे, गजानन बारसागडे आदीसह साधूबाबा नगर प्रभाग क्रमांक १३, गणेश नगर प्रभाग क्रमांक १२ व १३, प्रभाग क्रमांक १३ मधील आॅफीसर कॉलनी तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील गायत्री नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.येत्या सोमवारपासून तलावाच्या पाळीचे काम पूर्ववत सुरू करण्याबाबतची माहिती आपण नगराध्यक्षांना दिली असून या पाळीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय गंगथडे यांनी नागरिकाच्या शिष्टमंडळांना चर्चेदरम्यान सांगितले.६ जुलैला मोर्चा काढणारसाधूबाबा नगराजवळील नागोल तलावाच्या पाळीचे बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्यात यावे, अन्यथा ६ जुलै रोजी नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशारा साधूबाबा नगर, गणेश नगर, गायत्री नगर व आॅफीसर कॉलनीतील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदनाची प्रत जलसंपदामंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार व आमदारांना पाठविण्यात आली आहे.