शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

तलावाच्या पाळीचे काम बंद केल्याने नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:58 IST

चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देनिवेदन । तीन प्रभागातील नागरिकांची एसडीओ कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर हे काम अचानक बंद पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी २९ जून रोजी शनिवारला चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी विजया जाधव यांनी स्वीकारले. तर नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी संजय गंगथडे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना पी. जे. सातार, एच. डब्ल्यू. उत्तरवार, कोपेश्वर लडके, एस. एस. घागरे, व्ही. एन. सालेकर, आर. जी. वासेकर, के. डी. बोबाटे, आर. एन. धोडरे, संजय कुनघाडकर, महेंद्र वासेकर, कालिदास बुरांडे, गजानन बारसागडे आदीसह साधूबाबा नगर प्रभाग क्रमांक १३, गणेश नगर प्रभाग क्रमांक १२ व १३, प्रभाग क्रमांक १३ मधील आॅफीसर कॉलनी तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील गायत्री नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.येत्या सोमवारपासून तलावाच्या पाळीचे काम पूर्ववत सुरू करण्याबाबतची माहिती आपण नगराध्यक्षांना दिली असून या पाळीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय गंगथडे यांनी नागरिकाच्या शिष्टमंडळांना चर्चेदरम्यान सांगितले.६ जुलैला मोर्चा काढणारसाधूबाबा नगराजवळील नागोल तलावाच्या पाळीचे बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्यात यावे, अन्यथा ६ जुलै रोजी नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशारा साधूबाबा नगर, गणेश नगर, गायत्री नगर व आॅफीसर कॉलनीतील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदनाची प्रत जलसंपदामंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार व आमदारांना पाठविण्यात आली आहे.