शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी गावात आलेला चितळ ठार

By admin | Updated: April 12, 2017 01:06 IST

येथील वीज वितरण कंपनी कार्यालयालगत असलेल्या आंबे तलावात पाण्याच्या शोधात तहाण भागविण्यासाठी आलेला ....

पाणवठे कोरडे : उष्णतामानाने होरपळताहेत वन्यजीव वैरागड : येथील वीज वितरण कंपनी कार्यालयालगत असलेल्या आंबे तलावात पाण्याच्या शोधात तहाण भागविण्यासाठी आलेला चितळ जखमी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी रविवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास वैरागड वन क्षेत्रात घडली. या चितळाचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला.वीज वितरण कार्यालय लगतच्या आंबे तलावात तहाण भागविण्यासाठी आलेल्या चितळाची कोणी तरी शिकार करण्याच्या प्रयत्नात चितळाला दगड मारून जखमी केले. उपचारादरम्यान दोन दिवसांनी चितळ ठार झाला. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात येणाऱ्या वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास वैरागड वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७४२ मध्ये जखमी अवस्थेत पडून असलेला १० महिने वयाचा चितळाचा पाडस काही व्यक्तींच्या दृष्टीस पडला. संबंधित व्यक्तीने याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वैरागड येथील क्षेत्र सहायक मेश्राम, वनरक्षक श्रीकांत सेलोटे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी चितळाला बेस्ट स्टेशनला आणले. मात्र वैरागडचे पशुधन विकास अधिकारी नसल्याने या जखमी चितळावर उपचार करण्यासाठी दुपारचे २ वाजले. चितळाच्या पाठीवरचा हाड मोडला असल्याने दोन दिवसांच्या उपचारानंतर चितळाचा मृत्यू झाला. सध्या वैरागड, मानापूर, सुकाळा, कुरंडी, मोहझरी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाला आगी लागल्या आहेत. या आगीत वन्यजीव त्याच ठिकाणी होरपळून मरतात. अथवा जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटतात. अशावेळी मोकळ्या जागेचा अथवा लोकवस्तीचा वन्यप्राणी आसरा घेतात. मात्र अशा ठिकाणी सुध्दा वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. वैरागड जंगलात जखमी झालेल्या चितळाबाबत असाच प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. (वार्ताहर)