शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

वृद्ध आजीवर नातवांच्या संगोपनाची धुरा

By admin | Updated: August 20, 2016 01:25 IST

पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही.

मुन्ना तलांडीची मुले झाली निराधार : कुटुंबीय शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत रमेश मारगोनवार भामरागड भामरागड : पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही. मृतदेह न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वीच माहेरी निघून गेली. मुन्नाही पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे मुन्ना तलांडीची मुले निराधार झाले असून वृद्ध आजीवर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली आहे. पर्लकोटा नदीला ७ आॅगस्ट रोजी पूर आला होता. पुरामुळे मुन्ना तलांडी हा हेमलकसा येथे अडकला होता. सतत चार दिवस मुलांपासून दूर राहल्यामुळे मुन्ना तलांडी त्रस्त झाला होता. मुलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नसल्याने पर्लकोटा नदीचा पूर पोहून जाण्याचा धाडसी निर्णय तलांडीने घेतला. पर्लकोटा नदीच्या पुलावरून कंबरभर पाणी वाहत असताना त्याने नदी पात्रात उडी घेतली. नदी किनाऱ्यावरच्या नागरिकांना मुन्ना नदीपात्रात बऱ्याच अंतरावर पोहतांना दिसला. त्यानंतर काही दूर अंतरावरून तो अचानक गायब झाला. तेव्हापासून १३ दिवसांचा कालावधी उलटूनही त्याचा मृतदेह पोलीस प्रशासनाच्या हातात लागला नाही. मृतदेह मिळाल्याशिवाय त्याला प्रशासन मृतक घोषित करण्यास नकार देत आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर जी मदत मुन्नाच्या कुटुंबाला मिळायला पाहिजे होती ती मिळण्यास अडचण जात आहे. पोलिसांनीही त्याचा शोध थांबविला आहे. मात्र मुन्नाची वृद्ध आई व त्याचे नातेवाईक इंद्रावती नदीच्या पात्रात त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजुनपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. मुन्नाची मोठी मुलगी साक्षी ही सातव्या वर्गात शिकत आहे. तर दुसरा मुलगा सतीश हा दुसऱ्या वर्गात शिकत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वी माहेरी निघून गेली. वडीलही पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे मुन्नाचे दोन्ही मुले निराधार झाले आहेत. वृद्ध आजी त्यांचा संगोपन सध्य:स्थितीत करीत आहे. आईवडिलांविना जीवन जगण्याची पाळी साक्षी व सतीशवर आली आहे. मुन्नाचे कुटुंब मुन्नाच्या मोलमजुरीवरच्या उत्पन्नावरच जगत होते. मात्र मुन्नाच्या जाण्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधनच संपले आहे. त्यामुळे त्याच्या मुलांवर व आईवर उपासमारीची पाळी आली आहे. मृतदेह न मिळाल्याने शासकीय मदतीची दारेसुद्धा सध्य:स्थितीत बंद झाली आहेत. त्यामुळे तिघांचेही जगणे कठिण झाले असून सदर कुटुुंब मदतीची अपेक्षा करीत आहेत. म्हातारपणात मजुरी करून स्वत:चेच पोट भरणे अशक्य असतानाच आता नातवांचेही पोट भरण्याची जबाबदारी वृध्द आजीवर आली आहे. तिघेही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.