शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

वृद्ध आजीवर नातवांच्या संगोपनाची धुरा

By admin | Updated: August 20, 2016 01:25 IST

पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही.

मुन्ना तलांडीची मुले झाली निराधार : कुटुंबीय शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत रमेश मारगोनवार भामरागड भामरागड : पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही. मृतदेह न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वीच माहेरी निघून गेली. मुन्नाही पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे मुन्ना तलांडीची मुले निराधार झाले असून वृद्ध आजीवर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली आहे. पर्लकोटा नदीला ७ आॅगस्ट रोजी पूर आला होता. पुरामुळे मुन्ना तलांडी हा हेमलकसा येथे अडकला होता. सतत चार दिवस मुलांपासून दूर राहल्यामुळे मुन्ना तलांडी त्रस्त झाला होता. मुलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नसल्याने पर्लकोटा नदीचा पूर पोहून जाण्याचा धाडसी निर्णय तलांडीने घेतला. पर्लकोटा नदीच्या पुलावरून कंबरभर पाणी वाहत असताना त्याने नदी पात्रात उडी घेतली. नदी किनाऱ्यावरच्या नागरिकांना मुन्ना नदीपात्रात बऱ्याच अंतरावर पोहतांना दिसला. त्यानंतर काही दूर अंतरावरून तो अचानक गायब झाला. तेव्हापासून १३ दिवसांचा कालावधी उलटूनही त्याचा मृतदेह पोलीस प्रशासनाच्या हातात लागला नाही. मृतदेह मिळाल्याशिवाय त्याला प्रशासन मृतक घोषित करण्यास नकार देत आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर जी मदत मुन्नाच्या कुटुंबाला मिळायला पाहिजे होती ती मिळण्यास अडचण जात आहे. पोलिसांनीही त्याचा शोध थांबविला आहे. मात्र मुन्नाची वृद्ध आई व त्याचे नातेवाईक इंद्रावती नदीच्या पात्रात त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजुनपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. मुन्नाची मोठी मुलगी साक्षी ही सातव्या वर्गात शिकत आहे. तर दुसरा मुलगा सतीश हा दुसऱ्या वर्गात शिकत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वी माहेरी निघून गेली. वडीलही पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे मुन्नाचे दोन्ही मुले निराधार झाले आहेत. वृद्ध आजी त्यांचा संगोपन सध्य:स्थितीत करीत आहे. आईवडिलांविना जीवन जगण्याची पाळी साक्षी व सतीशवर आली आहे. मुन्नाचे कुटुंब मुन्नाच्या मोलमजुरीवरच्या उत्पन्नावरच जगत होते. मात्र मुन्नाच्या जाण्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधनच संपले आहे. त्यामुळे त्याच्या मुलांवर व आईवर उपासमारीची पाळी आली आहे. मृतदेह न मिळाल्याने शासकीय मदतीची दारेसुद्धा सध्य:स्थितीत बंद झाली आहेत. त्यामुळे तिघांचेही जगणे कठिण झाले असून सदर कुटुुंब मदतीची अपेक्षा करीत आहेत. म्हातारपणात मजुरी करून स्वत:चेच पोट भरणे अशक्य असतानाच आता नातवांचेही पोट भरण्याची जबाबदारी वृध्द आजीवर आली आहे. तिघेही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.