शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:25 IST

लस घेतली की किमान अर्धा तास केंद्रातच थांबा, असे शासन व प्रशासनाच्या वतीने वारंवार जाहीर करण्यात आले आहे. त्यामागे ...

लस घेतली की किमान अर्धा तास केंद्रातच थांबा, असे शासन व प्रशासनाच्या वतीने वारंवार जाहीर करण्यात आले आहे. त्यामागे कारण आहे. लस घेतल्यावर काही जणांना रिॲक्शन हाेण्याची भीती असते. अशावेळी संबंधित व्यक्ती केंद्रात राहिली तर केंद्रातील डाॅक्टर, परिचारिका लगेच धावपळ करून त्यांच्यावर औषधाेपचार करू शकतील. परंतु लस घेतल्यानंतर व्यक्ती लगेच निघून गेला आणि त्याला रस्त्यात पुरळ आली, रिॲक्शन झाले तर परिणामी प्रकृती बिघडून जीवाचे बरे वाईट होण्याची भीती असते. त्यामुळेच लस घेतल्यानंतर व्यक्तीला किमान अर्धा तास केंद्रात राहण्यास सांगितले जाते. तेव्हा संबंधितांनी याची काळजी घ्यावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बॉक्स......

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लसीकरणानंतर अर्धा तास ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे कुणाला चक्कर येऊ शकते. कुणाला रिॲक्शन होऊ शकते. कुणाला पुरळ येऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवावे लागते. लसीकरण केल्यानंतर त्या केंद्रावर असलेल्या आसन व्यवस्थेत किमान अर्धा तास थांबणे गरजेचे आहे. काही गंभीर दुष्परिणाम याच काळात समोर येतो. या ठिकाणी डॉक्टर, या दुष्परिणामावरील इंजेक्शन, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशी सर्व प्रकारची व्यवस्था असते. त्यामुळे थेट घरी न जाता थांबणे आवश्यक आहे.

बाॅक्स .......

लस हेच औषध

कोरोनावर अजूनही कोणतेच औषध सापडले नाही. सध्या तरी लस हाच पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. आता ३० वर्षापुढील सर्वांनाच लस दिली जात असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे आराेग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

काेट ....

लगेच घरी जाऊ नये

नागरिकांनी काेविड लस घेतल्यावर किमान अर्धा तास केंद्रावर थांबले पाहिजे. दुर्दैवाने काही दुष्परिणाम जाणवले तर लागलीच त्यावर उपाय करणे शक्य आहे. आजपर्यंत कोणाला दुष्परिणाम आढळले नाहीत. - डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली

बाॅक्स .....

जिल्ह्यात आजपर्यंत झालेले लसीकरण - १३,८२५

पहिला डोस - ९,७१८

दुसरा डोस - ६,६७१

एकूण केंद्र - ७२

३० ते ४० साठी केंद्र - २५