शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लालडोंगरी मार्गावरील नहराचा पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:38 IST

चामोर्शी : चामोर्शी -लालडोंगरी मार्गावर नहराचा मायनर आहे. त्याला ओलांडून जाण्यासाठी ५० वर्षांपूर्वी अरुंद पूल बांधकाम करण्यात आले आहे. ...

चामोर्शी : चामोर्शी -लालडोंगरी मार्गावर नहराचा मायनर आहे. त्याला ओलांडून जाण्यासाठी ५० वर्षांपूर्वी अरुंद पूल बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावरून दररोज दुचाकी व अन्य वाहनांची वर्दळ असते. पूल सध्या जीर्णावस्थेत असून त्याला संरक्षक कठडे नाहीत. असे असतानाही नागरिक या पुलावरून ये - जा करीत असतात. अनेकदा या पुलावर किरकोळ अपघातसुद्धा घडले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन या नहरावरील मायनरची उंची वाढवावी व रुंद पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सुरगावातील समाज मंदिरांची दुरवस्था

मुलचेरा : तालुक्यातील वेंगनूर ग्रा.पं.अंतर्गत सुरगाव व अडंगेपल्ली येथे समाज मंदिराच्या इमारतीचे आमदार निधीतून बांधकाम करण्यात आले. या समाज मंदिराच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने इमारतींची दैनावस्था झाली आहे. या इमारतींवर लाखो रुपयांचा खर्च होऊनही त्या निकामी झाल्या आहेत. मुलचेरा खासगी व सार्वजनिक कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. खिडक्या, दरवाजे, तावदान तुटले आहेत. गावातील मोकाट जनावरांच्या आश्रयाचे ठिकाण बनले आहेत. सुरगाव व अडंगेपल्ली ही दोन्ही गावे येतात. सदर दोन्ही गावांतील समाज मंदिरांची दुरुस्ती ग्रा.पं. निधीतून करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत

गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनचे आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्याने नाेंदणीकृत शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. ३१ जूनपर्यंतच उन्हाळी धान खरेदी केली जाते; परंतु उद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी केंद्र सुरू हाेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

झिंगानूर परिसरातील शेती बेभरवशाची

झिंगानूर : झिंगानूर हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे. या भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीवरच उपजीविका करावी लागते. मात्र, सिंचनअभावी शेतीसुद्धा साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. सिरोंचा तालुक्यात पाणीपातळी अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बोअरवेल किंवा विहीर देण्याची मागणी आहे. तालुक्यात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. या भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, सिंचनाची सुविधा नसल्याने शेती बेभरवशाची झाली आहे.

विजेविना अंगणवाड्यांतील साहित्य पडले धूळखात

काेरची : प्रत्येक गावात अंगणवाड्या निर्माण करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील प्रत्येक वॉर्डात दोन ते तीन अंगणवाड्या आहेत. मात्र, काही अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांना वीजपुरवठा करून दिला. मात्र, वीज बिल भरणार कोण? हे निश्चित झाले नाही. ग्रामपंचायतीनेही हात वर केले. त्यामुळे अंगणवाडीचे वीज बिल भरले नाही. परिणामी, अनेक ठिकाणच्या अंगणवाड्यांचा वीजपुरवठा अल्प कालावधीतच कपात करण्यात आला.

वेलगूर येथे पक्क्या रस्त्यांचे बांधकाम करा

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या दामरंचा ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या वेलगूर येथे अद्यापही अंतर्गत पक्के रस्ते बांधण्यात आले नाहीत. वेलगूर येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. वेलगूर परिसरातील अनेक गावांत अद्यापही अंतर्गत रस्त्यांचे पक्के बांधकाम करण्यात आले नाही. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे.

बोगस कापूस बियाण्यांपासून सावध राहावे

अहेरी : तालुक्यात मागील काही वर्षांपासून कापूस पिकाचा पेरा वाढत असून शेतकरी आता नगदी पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहत आहेत; परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही कंपन्या बनावट बियाणे तयार करून त्याची परस्पर विक्री शेतकऱ्यांना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाेगस बियाण्यांपासून सावध राहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सदर बियाण्यांमुळे व तणनाशकांचा वापर यामुळे जमिनीचा पोत खालावतो. तसेच मानवाला दुर्धर आजार हाेण्याची शक्यता आहे.

धानोरा शहरात अत्यल्प पाणीपुरवठा

धानोरा : मे महिना सुरू असल्याने कडक ऊन तापत आहे. तापमान वाढत असून लाकडाऊनमुळे नागरिक घरी राहत असल्याने कूलरचा वापर वाढल्याने पाणी अधिक प्रमाणात लागत आहे, तसेच अनेक विहिरींची पाण्याची पातळी खोलात गेली आहे. अनेक प्रभागांत विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मोजक्याच प्रभागात नगर पंचायतीद्वारे पाण्याचे टँकर सुरू आहेत. इतर प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.