शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

हक्काच्या जागेसाठी भामरागडमधील व्यावसायिकांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST

भामरागड : येथील पर्लकोटा नदीवरील नवीन पुलामुळे मुख्य मार्गावरील दुकाने आणि घरांना विस्थापित व्हावे लागणार आहे. पण त्यांना शासनाने ...

भामरागड : येथील पर्लकोटा नदीवरील नवीन पुलामुळे मुख्य मार्गावरील दुकाने आणि घरांना विस्थापित व्हावे लागणार आहे. पण त्यांना शासनाने अजूनही पर्यायी जागा दिलेली नाही. दुसरीकडे पुलाचे बांधकाम मात्र सुरू आहे. त्यामुळे हक्काची जागा द्या, अशी मागणी करीत येथील सर्व व्यावसायिकांनी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून सोमवारपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली.

नगरालगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीवर गेल्या आठ महिन्यांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा पूल भामरागड येथील मुख्य बाजारपेठेतून जाणार आहे. त्यामुळे अनेकांचे राहते घर व व्यावसायिकांची दुकाने पाडली जाणार आहेत. येथील व्यापाऱ्यांनी आठ महिन्यांपासून शासन-प्रशासनाकडे नवीन बाजारपेठेसाठी हक्काची जागा मिळावी म्हणून अनेक वेळा निवेदन दिले. मात्र, शासन-प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सर्व सोमवार (दि.२८) पासून मागणी मान्य होईपर्यंत त्रिवेणी व्यापारी संघटनेतर्फे धरणावर बसून आणि संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवत आंदोलनाला सुरुवात केली.

सर्वप्रथम भामरागडच्या मुख्य चौकालगत सर्व व्यावसायिक एकत्र आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल यांच्या हस्ते पुष्पहार घालून घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी त्रिवेणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, सचिव सलीम शेख, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठारे, सहसचिव आसिफ सुफी, सदस्य संदीप मोगरे, मनोज मंडल, अरुण बोस, बबलू शेख, प्रदीप कर्मकार, सुरेश कोडापे, शकील शेख, सुजीत डे, संतोष मद्देर्लावार, बहादूर आत्राम यांच्यासह संपूर्ण व्यापारी उपस्थित होते.

दरम्यान, तहसीलदार आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याशीही व्यापाऱ्यांची चर्चा झाली, पण समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांनी भामरागडात येऊन सर्वांसमोर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून ठोस तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(बॉक्स)

व्यापाऱ्यांचे आंदोलन रास्तच

हे आंदोलन सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भामरागडला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, त्रिवेणी व्यापारी संघटनेने केलेली मागणी रास्त आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी वास्तव्य करून दुकाने चालवत आहेत. त्यामुळे नवीन पुलासाठी घर किंवा दुकाने उद्ध्वस्त होणाऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि निवासासाठी जागा उपलब्ध करून त्यासाठी मदत करावी. या आंदोलनाला आदिवासी विद्यार्थी संघाचा पूर्ण पाठिंबा राहील, असे कंकडालवार यावेेळी म्हणाले.

===Photopath===

280621\20210628_142609.jpg

===Caption===

धरणे अंधोलन करताना व्यापारी