शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

रेगडी आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:56 IST

परिसरातील रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ऊन, पावसापासून बचावासाठी या इमारतीवर चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. नवीन इमारतीअभावी जीर्ण इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देछतावर झाकली ताडपत्री : २५ हजार लोकसंख्येसाठी केवळ तीनच प्राथमिक आरोग्य केंद

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : परिसरातील रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ऊन, पावसापासून बचावासाठी या इमारतीवर चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. नवीन इमारतीअभावी जीर्ण इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.घोट परिसरात चार पंचायत समिती क्षेत्र येतात. या परिसरात एकूण १९ गावे असून या गावांची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. मात्र या परिसरात घोट, अडपल्ली व रेगडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या परिसरात अपघात झाल्यास २० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णाला भरती करावे लागते. या प्रवासादरम्यान रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. घोट हे या परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय निर्माण करावे, अशी मागणी मागील २० वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नवजात शिशु व महिलांसाठी तज्ञ डॉक्टर नाही. घोट येथे १० बेडची सुविधा असलेली इमारत आहे. परंतु सदर इमारत पावसाळ्यात गळते. त्यामुळे रूग्ण व कर्मचाºयांची हेळसांड होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे घोट व रेगडी येथील इमारतींची दुरूस्ती करावी, घोट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करावे, अशी मागणी सिमुलतला ग्रामपंचायतीचे सरपंच सजल बिश्वास, शामल मंडल, पंचायत समितीच्या उपसभापती आकुली बिश्वास, साईनाथ नेवारे, सुगाबाई आत्राम, विलास उईके, उर्मिला पोगुलवार, शालिनी ठाकूर यांनी केली आहे. याबाबत जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांना विचारणा केली असता, शासनाकडे पाठपुरावा केला असल्याची माहिती दिली. या समस्यांबाबत जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे. विकासपल्ली व वेंगनूर येथे उपकेंद्र प्रस्तावित असल्याची माहिती डॉ.उमाकांत मेश्राम यांनी दिली.घोट येथे ग्रामीण रूगणालयाची मागणीघोट परिसरात एकूण १९ गावे आहेत. या गावांची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. मात्र या परिसरात ग्रामीण रूग्णालय नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रूग्णाला चामोर्शी किंवा मुलचेरा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविल्याशिवाय पर्याय राहत नाही. चामोर्शी तालुक्यातील टोकावर असलेल्या काही गावांचे अंतर चामोर्शीपासून ४० ते ५० किमी आहे. एवढे अंतर पार करून रूग्णालयात रूग्णाला दाखल करेपर्यंत रूग्ण दगावण्याची शकयता राहते. घोट हे मध्यवर्ती गाव असल्याने या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.