शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोहची नवीन वितरिका एकलपूर कंपार्टमेंटमधूनच तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:26 IST

आमगाव येथे इटियाडोह पाटबंधारे विभागामार्फत वैनगंगा उपकालवा दक्षिण ते उत्तर वाहिनी ९ कि.मी. अंतरावरून देण्यात आली आहे. सदर वितरिका ...

आमगाव येथे इटियाडोह पाटबंधारे विभागामार्फत वैनगंगा उपकालवा दक्षिण ते उत्तर वाहिनी ९ कि.मी. अंतरावरून देण्यात आली आहे. सदर वितरिका पूर्णपणे जीर्णावस्थेत असून देखभाल दुरुस्तीअभावी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहाेचत नसल्याने येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. वस्तुस्थिती लक्षात घेता इटियाडोहची नवीन वितरिका एकलपूर कंपार्टमेंट ९७ मधूनच द्यावी, अशी मागणी आमगाव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष माधव ढोरे यांनी केली आहे.

आमगावातील शेतीची आराजी इतर गावाच्या आराजीपेक्षा जास्त आहे. इटियाडोह पाटबंधारे विभाग वडसाच्या उदासीनतेमुळे आमगाव येथील शेती सिंचनाखाली असूनही पुरून ओलित होऊ शकत नाही. जीर्णावस्थेत असलेली वितरिका जागोजागी फुटत असल्याने अर्धेअधिक पाणी नाल्यात वाहून जाते. संबंधित विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या तेव्हा सदर जागेचे फोटो काढून नेण्यात आले; परंतु दुरुस्ती झाली नाही. प्रस्तावित नहर वनविभाग वडसा-एकलपूर कंपार्टमेंट ९७ मधून वैनगंगा उपकालवा ते कोहमारा रोड आमगाव फाट्याच्या खालून रेल्वे बोगदा जुन्या वितरिकेला जोडल्यास नवीन रेल्वे पूल बांधावे लागणार नाही. हा परिसर झुडपी जंगल असून आरक्षित जागा नसल्याने जंगलाचेही नुकसान होणार नाही.

आ. कृष्णा गजबे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना यापूर्वी निवेदन दिले हाेते. सदर निवेदनाची दखल घेऊन २४ फेब्रुवारी २०२१ ला जलसंपदा विभाग नागपूरचे मुख्य अभियंता यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याबाबत कार्यकारी अभियंता देसाईगंज यांना सूचना देण्यात आल्या होत्या. २६ फेब्रुवारी २०२१ ला प्रस्तावित नहराच्या जागेची पाहणीही करण्यात आली; मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी माधव ढाेरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

पाणी नाही तर कर नाही

वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हेतुपुरस्सर सदर बाबीकडे दुर्लक्ष करणे, वेळकाढू धोरण अवलंबणे तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या कामाची दखल न घेणे व प्रकरण प्रलंबित ठेवणे एवढीच कामे पाटबंधारे विभाग देसाईगंज करीत असल्याचा आराेप शेतकऱ्यांकडून हाेत आहे. शेतीसाठी ओलिताची साेय झाली तर शेतकरी स्वखुशीने कर भरेल. मात्र दुर्लक्ष झाल्यास शेतीसाठी पाणी नाही तर करसुद्धा भरणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.